2 May 2025 9:25 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post office Schemes | पोस्ट ऑफिसच्या 5 जबरदस्त योजना, गुंतवणूक करून बँक FD पेक्षा जास्त व्याज मिळवा SBI Personal Loan | पर्सनल लोन घेताय? व्याज दर आणि प्रोसेसिंग फी सह 5 वर्षांसाठी 5 लाखांवर किती EMI असेल पहा Motilal Oswal Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा या फंडात, 5 ते 10 पटीने पैसा वाढवा, संपत्तीत मोठी वाढ होईल EPFO Pension News | पगारदारांनो, EPFO कडून महिना पेन्शन मिळणार, तुम्हाला 5,357 रुपये मिळणार की 7,500 रुपये जाणून घ्या Horoscope Today | 02 मे 2025, तुमच्यासाठी शुक्रवारचा दिवस कसा असेल? तुमचे शुक्रवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शुक्रवार 02 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IRB Share Price | गुंतवणूकदारांसाठी खुशखबर, तज्ज्ञांनी दिली फायद्याची अपडेट, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
x

ग्रामीण भागात आले की 'युती गेली खड्ड्यात' अन मुंबईत गुपचूप युतीची बोलणी

ठाणे : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जेव्हा राज्याच्या ग्रामीण भागात दौऱ्यावर गेले की, ‘युती गेली खड्ड्यात’, अशा घोषणा देतात. त्यानंतर मुंबईत पोहोचले की पाठच्या दाराने गुपचूप मुख्यमंत्र्यांसोबत निवडणुकसंदर्भात युतीची चर्चा सुरु करतात. त्यामुळे भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना म्हणजे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, अशी खरमरीत टीका राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी भर सभेत केली.

त्याचवेळी शिवसेना आणि उद्धव ठाकरे म्हणजे सत्तेच्या गुळाच्या ढेपेला चिकटून बसलेला मुंगळा आहे, अशा बोचरी टीका करत राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेला लक्ष केले आहे. एनसीपीने सध्या सत्ताधाऱ्यांन विरुद्ध रान उठविण्यासाठी निर्धार परिवर्तन यात्रा सुरु केली आहे. ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे आयोजित या मेळाव्यास अजित पवार, जयंत पाटील, ठाण्याचे माजी पालकमंत्री गणेश नाईक, महिला आघाडीच्या चित्रा वाघ, आ. जितेंद्र आव्हाड, माजी खा. आनंद परांजपे व संजीव नाईक आदी वरिष्ठ नेतेमंडळी आणि पदाधिकारी उपस्थित होते.

दरम्यान, उपस्थितांशी संवाद साधताना अजित पवार म्हणाले की, कुठलाही घटक शिवसेना-भारतीय जनता पक्षाच्या कामाविषयी जराही समाधानी नाही. बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप मागील ५ दिवस सुरू आहे. परंतु, जण सामान्यांचे हाल होत असताना त्यात लक्ष घालायला मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे यांना जराही वेळ नाही. वर्षानुवर्षे या दोन्ही पक्षांची सत्ता असलेल्या बेस्टचा कामगार वर्ग अजिबात समाधानी नाही, तो सामान्य लोकांना काय सेवा देणार? ठाणे, कल्याण-डोेंबिवली महापालिकांसह ‘बेस्ट’मध्ये मोठा भ्रष्टाचार सुरू आहे. तसेच या तिन्ही महापालिकांत शिवसेना-भाजपाची सत्ता आहे. परिवहनखात्याचे मंत्री पद सुद्धा दिवाकर रावते आहेत. ते ‘शिवशाही’च्या नावाने एसटी बस चालवत आहेत. त्या शिवशाहीला दिवसाढवळ्या आग लागते. सर्वच स्तरांवर हे दोन्ही पक्ष अक्षरशः अपयशी ठरले आहेत अशी टीका पवारांनी भाषणादरम्यान केली.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Ajit Pawar(192)#udhav Thakarey(405)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या