पणजी : गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर उपचारासाठी अमेरिकेत गेले असताना गोव्यात घटनात्मक आणि राजकीय पेच निर्माण झाला आहे. १६ मार्चपासून खाणी बंद झाल्या तर त्यावर अवलंबून असलेल्या लोकांच आयुष्य आर्थिक संकटात सापडणार आहे. म्हणून गोव्यातील शिवसेना आक्रमक झाली असून त्यांनी गोव्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे.

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकरांच्या अनुपस्थितीत इतर मंत्र्यांना सध्या चिघळलेला खाणींचा प्रश्न सोडवता येत नसल्याने गोव्यात थेट राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी शिवसेनेने केली आहे. तशी अधिकृत मागणी शिवसेनेच्या उपराज्यप्रमुख आणि प्रवक्त्या राखी प्रभुदेसाई नाईक यांनी केली आहे.

Goa should have presidents rule demands Shivsena