30 April 2025 9:04 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 01 मे 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 01 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Reliance Share Price | जेएम फायनान्शियल फर्म बुलिश, रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्स टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RELIANCE AWL Share Price | जबरदस्त तेजीचे संकेत; 58 टक्के अपसाईड तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: AWL IRFC Share Price | पीएसयू शेअर्सबाबत महत्वाचे संकेत, मोठी झेप घेणार, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IRFC Jio Finance Share Price | हा शेअर लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा, संयम देईल मोठा परतावा - NSE: JIOFIN Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप शेअर्सबाबत महत्वाची अपडेट, फायदा देणारी अपडेट आली - NSE: TATATECH
x

Lakhimpur Kheri Violence | तिकीट नाकारलेल्या नेत्याच्या जिल्हा बंदीवरून भाजपचे स्टंट | तर सत्ता असलेल्या राज्यात दडपशाही

Lakhimpur Kheri Violence

लखनऊ , ०४ ऑक्टोबर | हिंसाचारग्रस्त लखीमपूर खेरी जिल्ह्यात (Lakhimpur Kheri Violence) पीडितांच्या नातेवाईकांना भेटण्यासाठी निघालेल्या काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी वॉड्रा यांना सोमवारी हरगाव येथून अटक करण्यात आली आहे, असा दावा पक्षाच्या युवा शाखेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास बी.व्ही. यांनी केला आहे. दरम्यान, केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या मुलाने कथितरीत्या शेतकरी आंदोलकांवर कार चढवली. यात 8 जण चिरडले आहेत.

Lakhimpur Kheri Violence. Permission denied for Chattisgarh CM Bhupesh Baghel and Punjab CM Charanjit Singh Channi flight to land in Lucknow Lakhimpur Kheri :

शेती कायद्यांना विरोध करण्यासाठी शेतकरी काळे झेंडे हातात घेऊन आंदोलन करत होते. या दरम्यान केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिषने आंदोलकांवर गाडी चढवली. यात एकूण 8 जणांचा मृत्यू झाला आहे. तर काहीजण जखमी झाले आहेत. या घटनेनंत प्रियांका गांधी पीडित शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी निघाल्या. मात्र त्यांना अनेक ठिकाणी रोखण्यात आलं. प्रथम त्यांना लखनौ विमानतळावर रोखण्यात आले.

प्रियांका गांधी मध्यरात्रीच लखीमपूरकडे रवाना झाल्या. मात्र पोलीस आणि जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना घटनास्थळी न जाण्यास सांगितले. पण प्रशासनाकडे कोणताही आदेश आणि वॉरंट नसल्याने प्रियांका गांधी न जुमानता लखीमपूरकडे रवाना झाल्या. पण उत्तर प्रदेश पोलिसांनी त्याला सीतापूरच्या हरगाव येथे ताब्यात घेतले.

त्यानंतर आता दोन मुख्यमंत्र्यांची विमाने उत्तर प्रदेशमध्ये उतरण्यास योगी सरकारने परवानगी नाकारली आहे, त्यामुळे उत्तर प्रदेशमध्ये नेमकं चाललंय काय?, असा सवाल उपस्थित होत आहे. उत्तर प्रदेश सरकारने मला राज्यात पाऊल न ठेवण्याचा आदेश काढलाय. उत्तर प्रदेश सरकार नागरिकांच्या अधिकारांवर बंधनं का आणत आहे?, जर लखीमपूरला कलम 144 लागू आहे तर मग लखनौला विमान उतरण्यास परवानगी का नाकारण्यात आली आहे. हे सरकार हुकुमशाही पद्धतीने वागत आहे, योगी सरकारचा निषेध, अशा संतप्त भावना मुख्यमंत्री भुपेश बघेल यांनी व्यक्त केल्या आहेत.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: Lakhimpur Kheri Violence permission denied for congress leaders in Uttar Pradesh.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Yogi Government(87)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या