मुंबई : आगामी लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर रामनामाचा जप करण्यास शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सुरुवात केल्याने त्यांच्यावर आमदार नितेश राणे यांनी टीका केली आहे. उद्धव ठाकरे अयोध्येला जाण्यापूर्वी माती कलश घेऊन जाण्यासाठी शिवनेरीवर दाखल झाले आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थान असलेल्या शिवनेरी किल्ल्यावरील माती अयोध्येला घेऊन जाण्याची त्यांची योजना आहे. अनेक साधू संतांनी सुद्धा उद्धव ठाकरे हे सगळं केवळ राजकारणासाठी करत आहेत अशी टीका केली आहे. त्यामुळे आता आमदार नितेश राणे यांनी सुद्धा शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली आहे.

आमदार नितेश राणे यांनी ट्विटरद्वारे शिवसेना प्रमुखांवर जोरदार निशाणा साधला आहे. त्यात त्यांनी म्हटलं आहे, “जे शिवजयंतीला कधी शिवनेरी किल्ल्यावर जात नाहीत, ते राजकारणासाठी मात्र तिथली माती उचलायला तयार झाले आहेत.

तसेच पुढे लिहिलं आहे की;

शिवजयंतीला कधी न जाणारे। चालले आहेत शिवनेरीला॥
शिवराय लक्षात ठेवतील । कधी न येणा-या कावळ्यांना ॥

MLA nitesh rane criticised udhav thackeray on shivneri visit