27 September 2023 12:12 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Ganesh Pandal Fire | पुण्यात गणेश मंडपाला आग, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आणि बावनकुळे देखील मंडपात उपस्थित होते GTL Infra Vs Sonu Infra Share | जीटीएल इन्फ्राला ऑर्डर मिळेना, पण सोनू इन्फ्राटेक कंपनीला रिलायन्ससह अनेक ऑर्डर्स, स्वस्त शेअर सुसाट तेजीत Zen Tech Share Price | मार्ग श्रीमंतीचा! झेन टेक्नॉलॉजी शेअरने अवघ्या 9 महिन्यात 317 टक्के परतावा दिला, भरवशाचा स्टॉक खरेदी करणार? Multibagger Stocks | एलटी फूड्स शेअरने अल्पावधीत 75 टक्के परतावा दिला, हा शेअर खरेदीसाठी ऑनलाईन गर्दी, कारण काय? Tata Power Share Price | पॉवर सेक्टर स्टॉकमध्ये जोरदार तेजी, विजेच्या वाढत्या मागणीचा फायदा टाटा पॉवर शेअरला होणार? Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 27 सप्टेंबर 2023 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | खुशखबर! सणासुदीच्या दिवसात सोन्याचे भाव धडाम झाले, घसरण सुरूच, आज किती स्वस्त झाले सोन्याचे दर जाणून घ्या
x

देशातील हुकूमशाही ७-८ महिन्यांत संपेल: राज ठाकरे

चिपळूण : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे खोटं बोलून देशातील सामान्य जनतेला फसवत आहेत, परंतु लोक हे आता खपवून घेणार नाहीत अशा शब्दात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोदींवर सडकून टीका केली आहे. सध्या राज ठाकरे के कोंकण दौऱ्यावर असून ते रत्नागिरी दाखल झाले असून त्यांनी चिपळूण येथे पत्रकार परिषद आयोजित केली होती.

मोदी सरकारला आज ४ वर्ष पूर्ण होत असून त्यांनी आता साफ नीयत-सही विकास हा नवा नारा दिला आहे. तर दुसरीकडे विरोधकांनी हा दिवस म्हणजे ‘विश्वासघात दिन’ म्हणून पाळणार आहेत. राज ठाकरे कोंकण दौऱ्यावर असून ते कार्यकर्त्यांच्या व पदाधिकाऱ्यांच्या तसेच स्थानिक कोंकणी लोकांच्या भेटीगाठी घेऊन त्यांच्या समस्या समजून घेत आहेत.

याच दौऱ्यात अनेक पत्रकार त्यांना मोदी सरकारच्या कारभारा विषयी प्रश्न विचारात आहेत. आज मोदीसरकारला ४ वर्ष पूर्ण होत असल्याने पत्रकांनी त्यांना मोदी सरकारच्या कारभाराविषयी प्रश्न केलं तेव्हा, ‘देशातील हुकूमशाही ७-८ महिन्यांत संपेल’ असं उत्तर दिल आहे. मोदींनी सामान्य जनतेला फसवलं आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत जनता हे सर्व खपवून घेणार नाही असं राज ठाकरे म्हणाले.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x