पुणे : सरकारकडून वारंवार मराठा आरक्षणासाठी निघणारे मोर्चे थांबले पाहिजे असं आवाहन केलं जात आहे. परंतु सरकारने योग्य वेळीच निर्णय घेतला असता तर मराठा समाजावर ही वेळच नसती आली नसती, असे खासदार उदयनाराजे भोसले म्हणाले. तसेच त्यांनी अॅट्रॉसिटीच्या विषयाला हात घालून केंद्रावर सुद्धा ताशेरे ओढले.

खासदार उदयनराजे भोसले यांनी आज सकाळी पुण्यात पत्रकार परिषद आयोजित केली होती, तेव्हा त्यांनी राज्य सरकार तसेच केंद्र सरकारवर मराठा आरक्षणावरून तुफान टीका केली. राज्य सरकार खूप आवाहन करत आहे की मराठा समाजाची आंदोलन थांबली पाहिजे. परंतु योग्य वेळीच निर्णय घेतला असता तर मराठा समाजावर ही वेळच नसती आली नसती असं उदयनराजे म्हणाले.

दरम्यान सुप्रीम कोर्टाने अॅट्रॉसिटीसंदर्भात जो निर्णय दिला होता तो कायद्याद्वारे रद्दबातल करण्यासाठी दिल्लीच्या केंद्र सरकारने तातडीने पावले उचलली. परंतु तीच तत्परता केंद्रातील व राज्यातील भाजपा सरकारने मराठा आरक्षणासाठी का नाही दाखवली, असा प्रश्न सुद्धा खासदार उदयनराजे भोसले यांनी उपस्थित केला. सरकारने याबाबतीत वेळीच योग्य पावले उचलली असती तर आज मराठा समाजातील लोकांना जीव गमवावा लागला नसता, असे त्यांनी म्हटले आहे.

MP Udayan Raje criticised state and central government over maratha reservation issue