महत्वाच्या बातम्या
-
अदानींच्या विमानामधून उड्डाण करणारे हे सज्जन शेतकऱ्यांचे हितचिंतक | मोदींना जोरदार टोला
मागील कित्येक महिन्यांपासून दिल्लीत शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. यामध्ये हरियाणा, पंजाब आणि उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग असल्याचं पाहायला मिळालंय. केंद्र सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये अनेकदा चर्चा झाली असून शेतकरी आपल्या मागण्यांवर ठाम असलेले पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे शेतकरी आंदोलनाला आता तब्बल ७ महिने उलटले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
पवार आणि मुख्यमंत्र्यांमध्ये जवळपास तासभर चर्चा | कोणत्या मुद्यावर चर्चा?
राज्याच्या राजकारणात महत्वाची घडामोडी घडत असल्याचे वृत्त आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या निवासस्थानी पोहोचले आहेत. दरम्यान या बैठकीमध्ये कोणत्या विषयावर चर्चा होत आहे याविषयी अद्याप माहिती समोर आलेली नाही. यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.
4 वर्षांपूर्वी -
विधिमंडळ पावसाळी अधिवेशन | शिवसेनेकडून सर्व आमदारांना व्हिप जारी
महाराष्ट्राच्या विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन ५ आणि ६ जुलैला होत आहे. या अधिवेशनात संपूर्ण दिवस उपस्थित राहायच आहे. अधिवेशनात पुरवणी मागण्या शासकीय कामकाज आणि पुरवणी विनियोजन विधेयके यावर चर्चा मतदान करून मंजूर करण्यात येणार आहे. त्यामुळे शिवसेनेच्या सर्व आमदारांनी संपूर्ण अधिवेशन पूर्ण दिवस उपस्थित राहिले पाहिजे, असा पक्षादेश व्हीप शिवसेनेचे प्रतोद आमदार सुनील प्रभू यांनी शिवसेना विधिमंडळ पक्षनेते कार्यालयाद्वारे शिवसेनेच्या आमदारांना जारी केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
पात्रतेपेक्षा जास्त मिळाले की असं होत, आपल्या भाषेवरून आपल्या संस्कारांची ओळख होते - शरयू देशमुख
देवेंद्र फडणवीस यांना ओबीसी आरक्षणावरून केलेल्या वक्तव्यावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी टोला लगावला असून, वेगळा विदर्भ झाल्याशिवाय लग्न करणार नाही असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते, त्याचं काय झालं, अशी विचारणा थोरात यांनी केली होती. थोरात यांच्या या वक्तव्यानंतर भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी या वक्तव्यावरून थोरातांना टोला लगावला आहे.
4 वर्षांपूर्वी -
ED'चं ठरलंय? देशमुखांना चौकशीनंतर..? | गृहमंत्री वळसे पाटील, आव्हाड आणि मुंबई पोलीस आयुक्त वर्षावर
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या ईडी चौकशीच्या (ED) पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर राष्ट्रवादीचे दिग्गज मंत्री वर्षा बंगल्यावर दाखल झाले. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड हे शरद पवारांच्या जवळचे मंत्री वर्षा बंगल्यावर पोहोचले. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे हे सुद्धा वर्षावर उपस्थित आहे. इथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत महत्त्वाची बैठक होत आहे.
4 वर्षांपूर्वी -
चौकशीस गैरहजर राहण्यासाठी अनिल देशमुखांचे ईडीला पत्र | ईसीआयआरची प्रत देण्याची विनंती
महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना आज इडीने चौकशीसाठी समन्स पाठवले होते. परंतु, अनिल देशमुख आज पुन्हा एकदा ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर राहिले नाहीत. त्यांनी ईडीला लिहिलेल्या पत्रात आपले वाढते वय आणि कोरोनाचा धोका असे कारण सांगत चौकशीतून सूट मिळवण्याची मागणी केली आहे. पत्र लिहिल्यानंतर काही वेळातच त्यांच्या वकिलांनी ईडी कार्यालय गाठले आहे.
4 वर्षांपूर्वी -
राज ठाकरेंच्या कुटुंबातील श्नान 'जेम्स'चं निधन | घरातील सदस्यप्रमाणेच अखेरचा निरोप दिला
राज ठाकरेंच्या कुटुंबातील श्नान म्हणजेच त्यांच्या लाडक्या जेम्सचा मृत्यू झाला आहे. सोमवारी रात्री १२ च्या सुमारास जेम्सचं निधन झालं आहे. राज ठाकरे हे श्वान प्रेमी आहेत. ग्रेट डेन प्रजातीचा जेम्सही अनेक वर्ष त्यांच्यासोबत होता. परंतु वयोमानानुसार जेम्सने काल अखेरचा श्वास घेतला. लाडक्या कुत्र्याच्या निधनाने राज ठाकरेंना धक्का बसला आहे. राज ठाकरेंकडे एकूण तीन ग्रेट डेन होते. त्यापैकी बॉन्ड आणि शॉन आधी गेले, तर आता जेम्सही गेला आहे.
4 वर्षांपूर्वी -
शिवसेनेचे लग्न आमच्यासोबत झाले | आम्ही मंगळसूत्र घातल्यानंतर अचानक नवरी पळून गेली - आ. सुरेश धस
मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर मंत्री विजय वडेट्टीवार हे मनाला येईल ते बोलत आहेत. राज्य सरकार मात्र काहीच करत नाही. वडेट्टीवार फडतूस असून त्यांनी बीड जिल्ह्यात पाऊल ठेवून दाखवावे. पोलिस बंदोबस्तातच त्यांचा सत्कार केला नाही तर सुरेश धस नाही, असा इशारा भारतीय जनता पक्षाचे आमदार सुरेश धस यांनी दिला. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी बीड शहरात साेमवारी सकाळी काढलेल्या विराट मोर्चाची वेळी त्यांनी वडेट्टीवार यांच्यावर टीका केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केल्यांनतर विराट मोर्चाला सुरुवात झाली.
4 वर्षांपूर्वी -
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीचे समन्स | आज चौकशीसाठी राहणार हजर
ईडीने महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना समन्स बजावले आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी आज देखमुखांची चौकशी केली जाणार आहे. 100 कोटी रुपये वसूल प्रकरणात ईडीकडून तपास केला जात असताना, मुंबईतील काही बार मालकांना चौकशीसाठी बोलावले होते. या चौकशीदरम्यान मुंबईतील 10 बार मालकांनी अनिल देशमुख यांना प्रत्येकी 4 कोटी रुपये दिले असल्याची कबुली दिल्याचा दावा ईडीने केला आहे. शुक्रवारी ईडीने अनिल देशमुख यांच्या मुंबई, नागपूर व इतर ठिकाणी छापेमारी केली होती. यानंतर अनिल देशमुख यांचे स्वीय सहायकास (पीए) संजीव पलांडे व कुंदन शिंदे यांना अटक करण्यात आली. त्यांच्या चौकशीनंतर ईडीकडून देशमुख यांना समन्स पाठवले होते. यापूर्वीही मुंबई येथे देशमुख यांची सक्तवसुली संचालनालयाकडून चौकशी झाली होती.
4 वर्षांपूर्वी -
संजय राऊतांच्या राजकीय गाठीभेठी | मुख्यमंत्र्यांशी तासभर चर्चा केल्यानंतर पवारांच्या भेटीला
महाविकास आघाडी सरकारमधील तिनही पक्षांमध्ये सर्वकाही आलबेल असल्याचं वारंवार सांगितलं जात आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पडद्यामागे काहीतरी शिजत असल्याचं बोललं जात आहे. कारण, शिवसेनेचे खासदार संजय राऊत आज पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीला पोहोचले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी ही भेट होत आहे. शनिवारीही संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. त्यानंतर आज दुसऱ्यांदा राऊत मुख्यमंत्र्यांच्या भेटीला पोहोचले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
सत्ता दिली तर ओबीसींना आरक्षण मिळवून देऊ म्हणतात | नाही दिली तर फडणवीस मदत करणार नाहीत असे वाटते
ओबीसी आरक्षण पूर्ववत करुन न दिल्या राजकीय संन्यास घेईन अशी गर्जना करणाऱ्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर महाविकास आघाडीचे नेते हल्लाबोल करत आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्यानंतर आता राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी फडणवीसांवर निशाणा साधला. देवेंद्र फडणवीस यांनी राजकारणातून संन्यास घेऊ नये, ते विरोधी पक्षनेते म्हणून उत्तम काम करत आहेत, त्यांनी 5 वर्षे सरकारला सूचना कराव्यात, असा सल्ला एकनाथ खडसे यांनी दिला.
4 वर्षांपूर्वी -
आपली निष्ठा सिद्ध करण्यासाठी आयात नेत्यांना पवार साहेबांवर टिका करावी लागते - रुपाली चाकणकर
देवेंद्र फडणवीस एकटेच राजकीय संन्यास घेणार आहेत की मोदीजींनाही सोबत नेणार आहेत? OBC आरक्षणाचा बळी देण्यात दोघांचाही मोलाचा वाटा आहे. लबाड लांडगा ढोंग करतंय, ओबीसींचे नाव घेऊन मी पुन्हा येईन चं सोंग करतंय असं म्हणत चाकणकरांनी फडणवीसांवर टीका केली होती.
4 वर्षांपूर्वी -
वेगळा विदर्भ झाल्याशिवाय लग्न करणार नव्हते | लोकांना फसवून सत्ता मिळवणं हाच भाजपचा उद्देश - बाळासाहेब थोरात
विदर्भ स्वंतत्र राज्य होत नाही तोपर्यंत मी लग्न करणार नाही, अशी प्रतिज्ञा २००४ साली देवेंद्र फडणवीस यांनी ते मुख्यमंत्री नसताना केली होती. आता त्यांचे लग्न होऊन कित्येक वर्षे उलटली, ते पाच वर्षे राज्याचे मुख्यमंत्री आहेत. मात्र स्वतंत्र विदर्भाबाबत त्यांनी चक्कार शब्दसुद्धा काढला नाही.
4 वर्षांपूर्वी -
ओबीसींनो, आता मोठ्या फसवणुकीला सज्ज राहा | फसवणूक झालेल्या धनगर समाजाच्या नेत्यांचा फडणवीसांच्या आश्वासनावरून हल्लाबोल
विरोधी पक्षनेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा खोटे बोलण्यात कोणी हात धरू शकणार नाही. त्यांनी सात वर्षांपुर्वी धनगर समाजाला १५ दिवसांत अनुसूचित जमातीचे आरक्षण देण्याचे आश्वासन दिले, पण प्रत्यक्षात आरक्षण मिळणारच नाही, याची व्यवस्था केली, शिवाय बुद्धीभेद करून धनगर समाजाच्या राजकीय जागृतीची चळवळ संपवली. बहुजनद्वेषी फडणवीसांचा डोळा आता ओबीसी समाजावर आहे. त्यांनी ओबीसींच्या खांद्यावर बंदूक ठेवून नवे आश्वासन दिले आहे. त्यांचा आवेश पाहता ओबीसी बांधवांनी नव्या फसवणुकीला तयार राहावे, असा इशारा धनगर विवेक जागृती अभियानाचे संयोजक विक्रम ढोणे यांनी दिला आहे. फडणवीसांच्या आश्वासनाला धनगर समाज ज्याप्रमाणे भुलला, त्याप्रमाणे ओबीसी समाजाने भुलून जाऊन नये, फडणवीसी डावपेचांपासून सावध राहावे, असे आवाहनही ढोणे यांनी केले आहे.
4 वर्षांपूर्वी -
राष्ट्रवादी जोमात | भाजप समर्थक आमदार करणार राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश
सध्या सगळे राजकीय पक्ष स्वतः ला सक्षम करत असून आपलं बळ वाढवताना दिसत आहेत. अशात पंढरपूर-मंगळवेढा येथील राष्ट्रवादीचे दिवंगत आमदार भारत भालके यांचं काही महिन्यापूर्वी निधन झालं होतं. त्यामुळे येथे पोटनिवडणूक लावण्यात आली होती. ज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार भगीरथ भालके यांचा पराभव झाला होता. परंतु, आता एक आमदार राष्ट्रवादीच्या वाटेवर असून राष्ट्रवादीचं संख्याबळ पुन्हा वाढलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
कलानगर उड्डाणपुल दुसऱ्या मार्गिकेचे आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन | विरोधी पक्षनेते फडणवीसांना वगळले
वाहतूक कोंडीतून मार्ग काढण्यासाठी वांद्रे- कलानगर जंक्शन येथे उभारलेल्या उड्डाणपुलाच्या तीन मार्गिकांपैकी दुसरी मार्गिका आज (सोमवार) खुली केली जाणार आहे. तसेच करोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी मालाड येथे दोन हजार रुग्णांच्या क्षमतेचे करोना केंद्राचे लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सह विविध खात्याचे मंत्री, अधिकारी यावेळी उपस्थित राहणार आहेत. मात्र विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना या कार्यक्रमाला निमंत्रित करण्यात आलेले नाही. यावरून मनापमानाचा वाद चिघळण्याची शक्यता आहे.
4 वर्षांपूर्वी -
फडणवीसांनी असा त्रागा करुन घेऊ नये | संन्यास घेतील त्यांचे दुष्मन, शिवसेनेचा टोला
ओबीसींचे राजकीय आरक्षण सुप्रीम कोर्टाने रद्द केल्यानंतर राजकीय पक्ष या आरक्षणासाठी आक्रमक झाले आहेत. राज्यातील प्रमुख विरोधीपक्ष भारतीय जनता पक्षाने (भाजपा) राजर्षी शाहू महाराज जयंती दिनी राज्यभर चक्का जाम आंदोलन करुन ओबीसींचे राजकीय आरक्षण पुन्हा लागू करण्याची जोरदार मागणी केली. यावेळी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ‘सत्ता द्या तीन महिन्यांत ओबीसींना आरक्षण देईन; नाहीतर राजकीय संन्यास घेईन’ अशी राणा भीमदेवी थाटात घोषणा केली आहे. यावरुन शिवसेनेने फडणवीसांना जोरदार फटकारले आहे. तसेच फडणवीसांनी त्रागा करुन घेऊ नये. सर्वकाही सुरळीत व त्यांच्या मनाप्रमाणे होईल. संन्यास घेतील त्यांचे दुष्मन! असा चिमटाही काढला आहे.
4 वर्षांपूर्वी -
वेगळा विदर्भ होत नाही तोपर्यंत लग्नगाठ बांधणार नाही | तुमको ना भुल पायेंगे - आ. अमोल मिटकरी
विदर्भ स्वंतत्र राज्य होत नाही तोपर्यंत मी लग्न करणार नाही, अशी प्रतिज्ञा २००४ साली देवेंद्र फडणवीस यांनी ते मुख्यमंत्री नसताना केली होती. आता त्यांचे लग्न होऊन कित्येक वर्षे उलटली, ते पाच वर्षे राज्याचे मुख्यमंत्री आहेत. मात्र स्वतंत्र विदर्भाबाबत त्यांनी चक्कार शब्दसुद्धा काढला नाही.
4 वर्षांपूर्वी -
भाजपच्या चक्काजामवर सुमित राघवन भडकला | म्हणाला, हा काय मूर्खपणा आहे?
भारतीय जनता पक्षानं राज्यभरात ओबीसी आरक्षणासाठी चक्काजाम आंदोलन सुरु केलं आहे. मुंबईतील दहिसर-मीरारोड या भागातही प्रदर्शनं केली गेली. या आंदोलनादरम्यान कोरोनाचे सर्व नियम मोडल्याचं दिसून आलं. अनेकांच्या तोंडावर मास्क नव्हते. सोशल डिस्टंसिंग असण्याचा तर प्रश्नच नव्हता. या प्रकारावर प्रसिद्ध मराठी अभिनेता सुमित राघवन संतापला आहे. अशी आंदोलनं करुन नेमकं तुम्ही काय साध्य करताय? असा थेट सवाल त्यानं भाजपाला केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
एमआयएम'ची भूमिका भाजपच्या फायद्याची? | उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत १०० जागा लढवणार
उत्तर प्रदेशमध्ये २०२२ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर आता सर्वच राजकीय पक्षांच्या हालचालींना वेग आल्याचं दिसत आहे. आजच बहुजन समाज पार्टीच्या प्रमुख मायावती यांनी स्वबळचा नारा देत, एमआयएम सोबतच्या आघाडीच्या चर्चांना पूर्णविराम दिला. त्यानंतर आता एमआयएम कडून देखील या निवडणुकीच्या संदर्भात घोषणा करण्यात आली आहे.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक 5 टक्क्यांनी कोसळला, तज्ज्ञांनी सांगितलं स्टॉक Hold करा - NSE: IDEA
-
NBCC Share Price | मल्टिबॅगर शेअरची प्राईस 95 रुपये; यापूर्वी दिला 2155% परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: NBCC
-
BEL Share Price | पीएसयू डिफेन्स कंपनी शेअरसाठी 338 रुपये टार्गेट प्राईस; पडझडीत संधी - NSE: BEL
-
IREDA Share Price | पीएसयू शेअरमध्ये 4.81% घसरण, मल्टिबॅगर स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IREDA
-
IRFC Share Price | पीएसयू रेल्वे स्टॉकमध्ये 4.97% घसरण; तज्ज्ञांनी काय दिला सल्ला? टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRFC
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर फोकसमध्ये, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: JIOFIN
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर फोकसमध्ये, नेमकं कारण काय? टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर्समध्ये मोठी घसरण, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: ADANIPOWER
-
RVNL Share Price | पीएसयू रेल्वे कंपनी शेअरबाबत फायद्याची अपडेट, अपसाईड टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RVNL