अमरावती: आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मोदींनी देशभर सभांचा सपाटा लावला आहे. त्यानिमित्त आंध्र प्रदेशमध्ये मोदींची सभा आयोजित करण्यात आली होती. दरम्यान, मोदींनी यावेळी चंद्राबाबू नायडू यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. सध्या भारतीय जनता पक्षाने दक्षिणेकडील राज्यांकडे विशेष लक्ष केंद्रित केलं आहे.

यावेळी सभेतील भाषणावेळी चंद्राबाबूंना लक्ष करताना मोदी म्हणाले, चंद्राबाबूंनी सासऱ्याच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. ते उद्या दिल्लीत फोटो काढण्यासाठी जात आहेत. परंतु भारतीय जनता पक्ष स्वतःच्या कार्यकर्त्यांच्या पैशानं कार्यक्रम करते, तर हे आंध्र प्रदेशच्या सामान्य जनतेच्या तिजोरीतून पैसे काढून कार्यक्रम करत आहेत, अस सुद्धा नरेंद्र मोदी टीका करताना म्हणाले. ते गुंटूरमधल्या जनसभेला संबोधित करताना बोलत होते.

२०१४ मध्ये केंद्रात आमचं सरकार आलं तेव्हा आम्ही आंध्र प्रदेशसाठी विशेष पॅकेज दिलं. २०१६ मध्ये ते पॅकेज लागू देखील करण्यात आलं. त्यामुळे आंध्र प्रदेशला विशेष राज्या सारखीच त्यावेळी मदत मिळाली. दरम्यान, आंध्राच्या मुख्यमंत्र्यांनी या गोष्ट स्वीकारून केंद्राचे आभार मानले होते. परंतु केंद्रानं दिलेल्या पॅकेजचा चंद्राबाबू सरकारने योग्य वापर केला नाही. अखेर राज्याचा विकास करण्यात अपयशी ठरलेल्या टीडीपीनं पलटी घेतली, असा थेट हल्लाबोल मोदींनी केला आहे.

pm narendra modi criticise chandrababu naidu of andhra pradesh