राळेगणसिद्धी : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आज महात्मा गांधी पुण्यतिथीपासून पुन्हा मोदी सरकारच्या विरोधात पुन्हा उपोषणच्या मार्गाने एल्गार पुकारला आहे. दरम्यान, आंदोलनाच्या पार्श्वभुमीवर महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन सुद्धा राळेगणसिद्धीच्या दौऱ्यावर जाणार होते. परंतु, तत्पूर्वीच गिरीश महाजन राळेगणसिद्धीला येऊन काहीच फरक पडणार नसून अण्णा तरीदेखील उपोषणाला बसणारच आहेत असे सांगून त्यांना भेटण्यास स्पष्ट शब्दात नकार दिला आहे.
दरम्यान, पत्रकारांशी संवाद साधताना अण्णा म्हणाले की, ‘गिरीश महाजन यांच्या हातात काहीच नाही. या आंदोलनाच्या संबंधित तोडगा काढण्यासारखे जे सर्व काही आहे ते दिल्ली सरकारच्या हातामध्ये आहे. अण्णा हजारे यांनी आज सकाळी दहा वाजता यादवबाबांचे दर्शन घेऊन जण आंदोलनाला सुरुवात केली. दरम्यान राज्यातील तमाम कार्यकर्त्यांनी ठरल्यानुसार आपापल्या नियोजित ठिकाणी आंदोलन सुरू करण्याचे आवाहन सुद्धा यावेळी अण्णांनी केले आहे.
