30 May 2023 2:52 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
PPF Calculator | PPF कॅल्क्युलेटर सांगेल 1000 गुंतवून 18 लाख परतावा कसा मिळवायचा, पैसा वाढवणारी माहिती  Loan Recovery Rules | आता तुमचे बॅंकेचे EMI थकले तरी डोन्टवरी, कर्जदाराला आरबीआयने दिलेले महत्वाचे अधिकार लक्षात ठेवा Investment Tips | या सरकारी योजनेत दररोज 45 रुपये गुंतवल्यास 25 लाख रुपये परतावा मिळेल, अधिक जाणून घ्या Multiple Bank Accounts | बँकेत एकापेक्षा जास्त अकाउंट्स असतील तर आधी ही खबरदारी घ्या, अन्यथा... Plan 475 | ममता-नितीश यांचा प्लॅन 475 काय आहे? 2019 च्या निवडणुकीत काँग्रेसने 52 जागा जिंकल्या होत्या तर 209 जागांवर दुसऱ्या क्रमांकावर होते Triveni Engineering Share Price | मागील 5 दिवसात त्रिवेणी इंजिनिअरिंग अँड इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स तेजीत, नेमके कारण काय? Sterling Tools Share Price | मल्टीबॅगर स्टर्लिंग टूल्स शेअरचा गुंतवणूकदारांना 105% परतावा, आता 100% डिव्हीडंड देणार, स्टॉक डिटेल्स पहा
x

उद्धव ठाकरेंची राम मंदीर मुद्यावरून पलटी; आता 'पहले सरकार फिर मंदिर', सेना-भाजप युती झाली

RajThackeray, UdhavThackeray, RamMandir, Ayodhya, BJP, Shivsena, Yuti, loksabha2019, AmitShah, NarendraModi, Hindutva

मुंबई : केंद्रात आणि राज्यात डझनभर मंत्रिपद उपभोगून सतत सहकारी पक्ष भाजपवर विखारी आगपाखड करणारे शिवसेना पक्षाध्यक्ष उद्धव ठाकरे स्वबळाचा नारा देऊन पलटले आहेत. काही दिवसांपूर्वी हिंदुत्वाच्या नावाने घोषणा करत अयोध्या दौरा आयोजित करून मोठी जाहिरातबाजी देखील केली. दरम्यान, भाजपवर दबाव वाढण्यासाठी ‘पहले मंदिर फिर सरकार’ अशी घोषणा दिली. परंतु त्या घोषणेला त्यांनी स्वतःच तीरांजली दिली आहे. आज त्यांनी अयोध्येत मंदिर बनण्यापूर्वीच सरकार बनवण्याच्या दिशेने पाऊल टाकत भाजपसोबत आगामी लोकसभा-विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने संसार थाटण्याची अधिकुत घोषणा केली आहे.

गेले काही दिवस भाजपा व शिवसेनेत युती होणार की नाही याबद्दल शिवसेना व भाजपात साशंकता होती. मात्र, याला आता पूर्णविराम मिळाला आहे. आज, भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईत बीकेसी एमसीए येथे पत्रकार परिषद अधिकृत घोषणा केली आहे.

पुलवामा येथे दहशदवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात सीआरपीएफ ‘च्या तब्बल ४० जवानांना वीर मरण पत्करावा लागलं होतं. त्यानंतर संपूर्ण देश शोकाकुल झालेला असताना आणि तितक्याच प्रमाणात देशभरातून संताप व्यक्त करण्यात येत असताना देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात दोन दिवसांपूर्वीच मातोश्रीवर रात्री युतीबाबत महत्वाची बैठक पार पडली होती. यावेळी शिवसेनेकडून शिवसेना नेते आणि राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई व भाजपाकडून महसूलमंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित होते. या बैठकीची गुप्तता ठेवण्यात आली होती. परंतु, प्रसार माध्यमांमुळे ते लपून राहील नाही आणि त्यानंतर भाजप-शिवसेनेवर प्रचंड संताप व्यक्त करण्यात आला होता.

राज्यात लोकसभेसाठी दोन्ही पक्ष २४-२४ जागा लढणार असून विधानसभेच्या १४५ जागा भाजपा लढेल, तर शिवसेनेला १४३ जागा देण्यात आल्या आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरेंचा राजकारणातील या संधी साधू पणामुळे त्यांच्या विश्वासार्हतेला तडा गेल्याचे राजकीय विश्लेषकांना वाटतं.

हॅशटॅग्स

#udhav Thakarey(405)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x