24 April 2024 10:59 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IREDA Share Price | IREDA शेअर्समध्ये गुंतवणूक फायद्याची ठरेल? तज्ज्ञांनी जाहीर केला सपोर्ट लेव्हल आणि रेझिस्टन्स लेव्हल Yes Bank Share Price | येस बँक शेअर्सबाबत मोठी अपडेट आली, शेअर मोठ्या रॅलीसाठी सज्ज झाला, किती फायदा होईल? Bank Account Alert | महाराष्ट्रातील या बँकेत तुमचं खातं आहे? आता पैसे काढू शकणार नाही, RBI ने बंदी घातली IPO GMP | स्वस्त IPO शेअर आला! पहिल्याच दिवशी लॉटरी लागून मिळेल 113 टक्के परतावा, GMP चा धुमाकूळ Numerology Horoscope | 24 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 24 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Communication Share Price | टाटा कम्युनिकेशन्स शेअर्समध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून मोठी टार्गेट प्राईस जाहीर
x

तो पराभव मोदींचाच! सामनातून उद्धव ठाकरेंची टीका

मुंबई : पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीत भाजपाला आलेल्या अपयशावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सामनातून टीका बोचरी टीका केली आहे. त्यात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नम्रपणाची स्तुती करताना मोदींवर निशाणा साधण्यात आला आहे.

दरम्यान, ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा झालेला पराभव हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचाच पराभव असल्याची बोचरी टीका सामनातून करण्यात आली आहे. जर नरेंद्र मोदी हे प्रचारात उतरले नसते तर हा पराभव स्थानिक नेतृत्वाचा आणि अंतर्गत तिकीट घोटाळ्याचा ठरला असता. परंतु, पंतप्रधान पक्षातील सर्व फौजफाटा घेऊन निवडणुकीच्या प्रचारात उतरले होते.

तसेच त्याच्यासोबत भाजपचे संपूर्ण केंद्रीय मंत्रिमंडळ सुद्धा प्रचाराच्या रिंगणात उतरवले होते. त्यामुळे हा पराभव केवळ पंतप्रधानांचाच आहे, अशी खरमरीत टीका करण्यात आली आहे. सदर टीका आजच्या, ‘गांधी का टिकले?; महाभारत’ या आजच्या सामनातील संपादकीयमधून करण्यात आली आहे. त्यात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नम्र स्वभावाचे कौतुक करताना, ‘मोदी तर पंडित नेहरू, इंदिरा गांधी व राजीव गांधींचे देश उभारणीतील योगदान मानायला सुद्धा तयार नाहीत असा प्रश्न उपस्थित केला आहे.

दरम्यान, ५ राज्यांमधील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजपने संपूर्ण जवाबदारी संबंधित राज्यातील भाजपचे मुख्यमंत्री आणि वरिष्ठ नेत्यांवर ढकलून मोदींची कातडी वाचविण्याचे केविलवाणे प्रयत्न केल्याचे दिसते आहे. त्याला अनुसरूनच सामनातून ही टीका करण्यात आली असावी असं प्रथम दर्शनी वाटते आहे.

हॅशटॅग्स

#udhav Thakarey(405)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x