
Post Office Investment | गुंतवणुकीचा काळ आता बदलला आहे. भारतात एक काळ असा होता जेव्हा लोकं जमीन किंवा सोने खरेदी करत असत. यामागे सुरक्षित गुंतवणूक ही एकच भावना होती. म्हणजेच गुंतवणूकदारांचा पैसा सुरक्षित होता. मात्र, आता बाजारात सुरक्षित गुंतवणुकीसाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. यापैकी पोस्ट ऑफिसची “ग्राम सुरक्षा योजना” हा असाच एक पर्याय आहे ज्यामध्ये कमी जोखमीवर चांगला परतावा मिळू शकतो. या योजनेत 19 ते 55 वर्षे वयोगटातील लोक गुंतवणूक करू शकतात. या योजनेत विम्याची रक्कम 10,000 ते 10 लाख रुपयांपर्यंत आहे.
ग्राम सुरक्षा योजनेत गुंतवणूक कशी करावी?
पोस्ट ऑफिसच्या ग्राम सुरक्षा योजनेमध्ये आपण मासिक, त्रैमासिक, सहामाही आणि वार्षिक या आधारावर गुंतवणूक करू शकता. कोणत्याही कालावधीत तुमची पॉलिसी चुकली तर, तुम्ही प्रीमियम भरून बंद केलेली पॉलिसी पुन्हा चालू करू शकता. ग्राहकांना प्रीमियम माफ करण्यासाठी 30 दिवसांचा कालावधी दिला जातो. ग्राम सुरक्षा योजनेंतर्गत परताव्याची रक्कमही निश्चित आहे. ही रक्कम नामनिर्देशित व्यक्तीला वयाच्या 80 व्या वर्षी किंवा मृत्यू झाल्यास दिली जाते. गुंतवणूकदारांची इच्छा असल्यास, ते 3 वर्षानंतर पॉलिसी बंद करू शकतात परंतु त्यांना त्याचा कोणताही लाभ मिळणार नाही.
योजनेचे लाभ :
जर तुम्ही वयाच्या 19 व्या वर्षी 10 लाखांची पॉलिसी खरेदी केली, तर वयाच्या 55 व्या वर्षापर्यंत तुम्हाला मासिक प्रीमियम म्हणून 1,515 रुपये, 58 वर्षांसाठी 1,463 रुपये आणि 60 वर्षांसाठी 1,411 रुपये द्यावे लागतील. पॉलिसीधारकाला परतावा म्हणून 55 व्या वर्षी 31.60 लाख रुपये, 58 व्या वर्षी 33.40 लाख रुपये आणि वयाच्या 60 व्या वर्षी 34.60 लाख रुपये मिळतील. म्हणजेच, तुम्ही दररोज फक्त 47 रुपये गुंतवून, 35 लाख रुपये परतावा मिळवू शकता.
योजनेचे खास वैशिष्ट्य :
समजा जर तुम्हाला अडचणीच्या वेळी कर्ज हवे असेल आणि तुमच्या गुंतवणुकीचे 4 वर्ष पूर्ण झाले असतील तर तुम्ही ह्या गुंतवणूकीवर कर्ज देखील काढू शकता. याशिवाय पोस्ट ऑफिस गुंतवणूकदारांना यामध्ये बोनसही देते. गेल्या वर्षी गुंतवणूकदारांना प्रती 1,000 रुपयांसाठी 65 रुपये बोनस मिळाला होता.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.