मेलबर्न : बॉक्सिंग डे कसोटीत टीम इंडियाने अखेरच्या दिवशी विजय प्राप्त केला. भारतीय क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलियावर तब्बल १३७ धावांनी विजय प्राप्त केला आहे. दरम्यान, या सामन्यामुळे टीम इंडियाने ऑस्ट्रेलियावर २-१ अशी आघाडी घेतली आहे आणि सरत्या वर्षाचा अंत गोड केला आहे.
या तिसऱ्या कसोटीत भारतीय गोलंदाजांच्या आक्रमक माऱ्यापुढे ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी अक्षरशः नांगी टाकल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळेच २६१ धावांवर ऑस्ट्रेलियाचा दणदणीत धुव्वा उडविण्यात आला आहे. या विजयामुळे २ दिवसांवर येऊन ठेपलेल्या नववर्षाची सुरुवात आणि सरत्या वर्षाचा शेवट टीम इंडियासाठी आणि भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी गोड झाला आहे.
विजयासाठी ३९९ धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा निम्मा संघ केवळ १३५ धावांवर माघारी परतला होता आणि खेळपट्टीची गोलंदाजांना मिळत असलेली साथ पाहता उर्वरित फलंदाज सुद्धा झटपट तंबूत परततील अशी खेळपट्टी वाटू लागली होती. सामन्यातील अखेरच्या म्हणजे पाचव्या दिवशी टीम इंडियाने काही षटकांमध्येच ऑस्ट्रेलियाच्या उर्वरीत फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये धाडले. त्यामुळे २६१ धावांवर संपूर्ण संघ गारद झाला आणि भारताने १३७ धावांनी दुसरी कसोटी जिंकत मालिका सुद्धा जिंकली आहे.
#INDvAUS Third Test: India defeats Australia by 137 runs in Melbourne. pic.twitter.com/MzvsI2bTo4
— ANI (@ANI) December 30, 2018
