19 April 2024 1:22 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 19 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल KPI Green Energy Share Price | अवघ्या 6 महिन्यात 209% परतावा देणारा शेअर वेळीच खरेदी करा, मोठा फायदा होईल Dynacons Share Price | कुबेर कृपा करणारा शेअर, अल्पावधीत दिला 4300 टक्के परतावा, हा स्टॉक खरेदी करणार? Stocks To Buy | असे शेअर्स निवडा! अवघ्या एका महिन्यात दिला 90 टक्के परतावा, दोन शेअर्स मालामाल करतील Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 19 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Patel Engineering Share Price | 1 वर्षात 300% परतावा देणारा 59 रुपयाचा शेअर तेजीत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर PSU Stocks | सरकारी कंपनीचा शेअर तेजीत, अल्पावधीत दिला 85 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला
x

India Vs Pakistan T20 World Cup 2021 | पाकिस्तानने अखेर इतिहास बदलला | भारताचा 10 विकेटने पराभव

India Vs Pakistan T20 World Cup 2021

मुंबई, 25 ऑक्टोबर | बाबर आजमच्या नेतृत्वात पाकिस्तान संघाने अखेर टी-20 विश्वचषक स्पर्धेत इतिहास बदलला आहे. भारता विरुद्ध दुबई येथे झालेल्या सुपर-12 च्या पहिल्या सामन्यात टीम इंडियाने दिलेल्या 152 धवनचं माफक लक्ष्याच्या प्रत्युत्तरात पाकिस्तानने 10 विकेटने कर्णधार बाबर आजम आणि मोहम्मद रिझवानच्या दणकेबाज अर्धशतकी खेळीच्या जोरावर विजय मिळवला (India Vs Pakistan T20 World Cup 2021) आणि यंदाच्या स्पर्धेची विजयी सुरुवात केली.

India Vs Pakistan T20 World Cup 2021. Led by Babar Azam, the Pakistan team has finally changed the history of the T20 World Cup. In reply to Team India’s modest target of 152 Dhawan in the first match of the Super-12 against India in Dubai, Pakistan won by 10 :

बाबर 68 धावा तर रिझवान 79 धावा करून नाबाद परतले. भारतासाठी फलंदाजांच्या निराशाजनक खेळीनंतर गोलंदाजही प्रभाव पडू शकले नाही. सर्व मात्तबर गोलंदाज विकेट घेण्यात अपयशी ठरले. अशाप्रकारे बाबर आजमचा पाकिस्तान संघ वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासात भारताला पराभवाची धूळ चरणारा पहिलाच बनला आहे. यापूर्वी 12 वेळा विश्वचषक स्पर्धेत आमनेसामने आले होते ज्यात टीम इंडियाने निर्विवाद वर्चस्व गाजवले होते.

भारताची फलंदाजी गडगडली:
सर्वात आधी पाकिस्तानने नाणेफेक जिंकली त्यामुळे जिंकणारा संघ निवडेल अशी गोलंदाजीच त्यांनी निवडली. ज्यानंतर भारतीय फलंदाज मैदानात आले. यामध्ये फलंदाजीची सर्वाधिक मदार असलेल्या सलामीवीर रोहित आणि राहुल यांनी अवघे 0 आणि 3 रन केले. संपूर्ण सामन्यात विराट आणि ऋषभने केवळ झुंज दिली. यात कोहलीने 57 आणि पंतने 39 धावा केल्या. त्यानंतर कोणालाच खास कामगिरी करत आल्याने संपूर्ण संघाचा डाव 151 धावांवर 20 ओव्हरमध्ये आटोपला.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचे मत नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: India Vs Pakistan T20 World Cup 2021 Pakistan won by 10 wickets.

हॅशटॅग्स

#T20Cricket(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x