मुंबई : कर्णधार फैजल फजलच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या विदर्भाच्या संघाने सलग दुसऱ्या हंगामात क्रिकेटमध्ये मानाच्या समजल्या जाणाऱ्या रणजी करंडक स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे. अंतिम सामन्यात विदर्भाने सौराष्ट्रावर ७८ धावांनी विजय मिळवला. विदर्भाचं हे रणजी करंडकाचं द्वितीय विजेतेपद ठरलं आहे.

विदर्भाने विजयासाठी दिलेलं २०७ धावांचं आव्हान पार करताना सौराष्ट्राचा संघ केवळ १२७ धावांपर्यंतच पोहोचू शकला. टीमचा फिरकीपटू आदित्य सरवटेने विदर्भाच्या विजयात अत्यंत महत्वाची भूमिका बजावली. पहिल्या डावात सौराष्ट्राच्या पाच फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये धाडणाऱ्या आदित्यने दुसऱ्या डावात देखील सौराष्ट्राच्या सहा फलंदाजांना तंबूत धाडलं.

vidarbha cricket team won ranji trophy second time