विशाखापट्टणम : वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताय टीमचा कर्णधार विराट कोहलीने १०,००० धावांचा पल्ला गाठला आहे. १०,००० धावा पूर्ण करणाऱ्या खेळाडूंच्या क्लबमध्ये त्याने आज दिमाखात प्रवेश केला आहे. विराटने १०,००० धावांचा टप्पा केवळ २०५ डावांमध्ये ओलांडून एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.
आजच्या सामन्यात सर्वांचे लक्ष कर्णधार विराट कोहलीच्या त्या नव्या विक्रमाकडे लागले होते. त्याआधी विराटने २०४ डावांमध्ये ९९१९ धावांचा पल्ला गाठला होता. त्यामुळे आज त्याला १०,००० धावा पूर्ण करण्यासाठी ८१ धावांची गरज होती. याआधी सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि रिकी पाँटिंग यांनी अनुक्रमे २५९, २६३ आणि २६६ डावांमध्ये हा पल्ला गाठला होता. परंतु विराट कोहलीने तो केवळ २०५ डावांमध्ये ओलांडला आहे.
FIFTY!@imVkohli brings up his 49th ODI half-century ????????#INDvWI pic.twitter.com/SuI9I5JCYz
— BCCI (@BCCI) October 24, 2018
