मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आज जागावाटपासंदर्भात महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निवास्थानी आज सकाळी ही महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. परंतु, जवळपास अर्ध्या जागांबाबत दोन्ही पक्षांमध्ये जवळपास सहमती झाली असली तरी सुद्धा काही महत्वाच्या जागांचा तिढा अजूनही कायम आहे असं वृत्त आहे.
याआधीच्या बैठकीदरम्यान काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससदरम्यान १७ जागांवर सहमती झाल्याचे वृत्त आहे. तर १४ जागांवर आघाडीसाठी इतर मित्रपक्ष तसेच काँग्रस – राष्ट्रवादी चर्चा करणार आहे, असे समजते. महत्वाचं म्हणजे काही जागांवर तीव्र मतभेद पाहायला मिळत आहेत. त्यात पुणे, उस्मानाबाद, शिर्डी, नगर, औरंगाबाद, यवतमाळ या महत्वाच्या ६ जागांचा तिढा सर्वाधिक असल्याचं बोललं जात आहे.
