नवी दिल्ली: अयोध्या प्रकरणाची सुनावणी लवकरात लवकर करण्यात यावी, अशी मागणी करणारी याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे. दरम्यान, राम मंदिर जन्मभूमी आणि बाबरी मशीद वादाची सुनावणीची तारीख जानेवारीत निश्चित करण्यात येईल, असं यापूर्वीच सुप्रीम कोर्टाने म्हटलं होतं. परंतु, त्यानंतर सुनावणीनंतर लगेचच या प्रकरणाची सुनावणी लवकर घेण्यात यावी अशी मागणी करणारी याचिका दाखल करण्यात आली होती. परंतु, ही याचिका सुप्रीम कोर्टाने आज स्पष्ट पणे फेटाळून लावली आहे.

दरम्यान ही याचिका फेटाळल्यामुळे सत्ताधाऱ्यांची अडचण वाढली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भाजप आणि शिवसेनेने राम मंदिराचा मुद्दा महत्वाचा केला असून धार्मिक मुद्यांवरच लोकसभेला सामोरे जाण्याचा जणू चंगच बांधला आहे. दरम्यान, संबंधित याचिका ही अखिल भारत हिंदू महासभेनं दाखल केली होती. त्यामुळे हिंदुत्वादी संघटना मोदी सरकारवर अध्यादेश आणण्याचा दबाव आणू शकतात असं राजकीय विश्लेषकांनी मत व्यक्त केले आहे. आजच्या याचिकेवर बोलताना या प्रकरणात आपण आधीच आदेश दिलेले आहेत, असं म्हणत कोर्टाने महासभेची याचिका फेटाळून लावली.

supreme court of india has rejected a plea seeking for early hearing on ayodhya title suit case