राळेगणसिद्धी : आज अण्णांच्या उपोषणाचा चौथा दिवस असून त्याच्या वजनात तब्बल साडेतीन किलोची घट झाली आहे. अण्णांच्या वयाचा विचार करता ते त्यांच्या प्रकृतीसाठी चांगलं नाही असं डाक्टरांनी सांगितलं आहे. दरम्यान, मोदी सरकार अण्णांच्या उपोषणाची जराही दखल घेत नसल्याची खंत स्थानिक ग्रामस्थांनी व्यक्त केली असून, आता तीव्र आंदोलन उभारण्याचा निर्णय ग्रामस्थांनी ग्रामसभेत घेतल्याचे कळते.
लोकपाल आणि लोकायुक्तांची अंमलबजावणी करण्यात यावी तसेच स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशीप्रमाणे शेतकऱ्यांना हमीभाव द्यावा अशा विविध प्रलंबित मागण्यासाठी अण्णांनी उपोषणाचे हत्यार उपसून मोदी सरकार विरोधात एल्गार पुकारला आहे. त्याचाच आज चौथा दिवस आहे.
