राजस्थान : आरक्षणाच्या मुद्यावरून गुज्जर समाजाचे हिंसक आंदोलन आज देखील सुरूच आहे. त्यामुळे राज्यसरकारच्या अडचणीत प्रचंड वाढ झाली आहे. सरकारी नोकऱ्या तसेच शिक्षणात एकूण ५ टक्के राखीव जागांच्या मागणीसाठी सुरू केलेले आंदोलन तीव्र आणि हिंसक होताना दिसत आहे.

दरम्यान, गुज्जरांच्या हिंसक आंदोलनामुळे आज ३ रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या असून २ रेल्वे गाड्यांचा मार्ग बदलण्यात आल्याचे वृत्त आहे. गुर्जर आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून सवाई माधोपूर जिल्ह्यात इंटरनेट सेवा बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. दरम्यान, खबरदारीचा उपाय म्हणून गुर्जर नेता किरोरी सिंह बैन्स्ला यांना जिल्हाधिकाऱ्यांनी नोटीस बजावून रेल्वे मार्गावरून आंदोलकांना हटवण्याचे आदेश दिले आहेत.

rajasthan gujjar community reservation issue gone violent