19 May 2024 7:41 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI FD Interest Rates | SBI ग्राहकांनो! FD व्याजाचे नवे दर समजून घ्या, अन्यथा नुकसान, सर्व ग्राहकांना लाभ नाही Numerology Horoscope | 20 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 20 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या OPPO A59 5G | फक्त 12600 रुपयांत सर्वात स्वस्त 5G OPPO फोन, 128GB स्टोरेज आणि बरंच काही Tata Nexon | टाटा नेक्सॉन CNG व्हेरियंटमध्ये लवकरच लाँच होतंय, जाणून घ्या किती बदलणार SUV Swift Dzire Price | ब्रेकिंग! न्यू डिझायर कारची डिटेल्स फोटोसहित लीक, सर्व फीचर्स जाणून घ्या, 6 एअरबॅग्स HDFC Home Loan | पगारदारांनो! तुम्ही गृहकर्ज घेतलंय का? हे काम करा, व्याज कमी होईल आणि मॅनेज करणंही सोपं
x

गोध्रा हत्याकांडाप्रमाणे पुलवामा दहशतवादी हल्ला हे भाजपाच षडयंत्र: गुजरातचे माजी मुख्यमंत्री

Narendra Modi, Amit Shah, Pulawama, shankersinh vaghela, Loksabha Election 2019

नवी दिल्ली: गुजरातमधील बहुचर्चित गोध्रा हत्याकांडाप्रमाणेच जम्मू काश्मीरमधील पुलवामातला सीआरपीएफच्या जवानांवरील भ्याड दहशतवादी हल्लादेखील भारतीय जनता पक्षाच्या कारस्थानाचा भाग असल्याचा खळबळजनक आरोप गुजरातचे माजी मुख्यमंत्री शंकरसिंह वाघेलांनी केला आहे. पुलवामातल्या हल्ल्यासाठी वापरण्यात आलेल्या गाडीची नोंद गुजरातमध्ये करण्यात आली होती, असा दुसरा दावादेखील त्यांनी केला. गोध्रा हत्याकांडदेखील भारतीय जनता पक्षाच मोठं षडयंत्र होतं. लोकसभा निवडणुका जिंकण्यासाठी भाजपाकडून दहशतवादाचा आधार घेतला जातो, असा खळबळजनक आरोप त्यांनी केला.

बालाकोटमध्ये करण्यात आलेला एअर स्ट्राइक भाजपानं अगदी नियोजितपणे केलेला हल्ला होता, असा दावा वाघेला यांनी केला. दरम्यान ‘बालाकोटवर हवाई दलाकडून करण्यात आलेल्या हल्ल्यात कोणीही मारलं गेलं नाही. एअर स्ट्राइकमध्ये २०० जण मारले गेले नाहीत, हे कोणत्याही आंतरराष्ट्रीय संस्थेनं अधिकृतपणे सांगितलेलं नाही,’ याची आठवण वाघेला यांनी करून दिली. पुलवामा हल्ल्याची माहिती असूनही तो हल्ला होऊ दिला गेला, असा खळबळजनक दावा त्यांनी केला. ‘भारतीय गुप्तचर विभागानं पुलवामात हल्ला होणार असल्याची पूर्व कल्पना गृहमंत्रालयाला दिली होती. परंतु तरी देखील सदर हल्ला रोखण्यासाठी जाणीवपूर्वक पावलं उचलण्यात आली नाहीत,’ असा गंभीर आरोप त्यांनी केला.

बालाकोटमध्ये करण्यात आलेल्या एअर स्ट्राइकबद्दल वाघेला यांनी काही थेट सवाल उपस्थित केले. ‘बालाकोटमध्ये असलेल्या दहशतवाद्यांच्या तळांची माहिती सरकारकडे आधीपासूनच होती. मग तिथे आधीच कारवाई का करण्यात आली नाही? पुलवामात हल्ला होण्याची वाट का पाहिली गेली?,’ असे प्रश्न त्यांनी विचारले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या गुजरात मॉडेलवरही वाघेलांनी भाष्य केलं. ‘भाजपाचं गुजरात मॉडेल खोटं आहे. गुजरातमध्ये अनेक अडचणी आहेत. राज्य संकटातून जात आहे. राज्यातले भाजपा नेते नाराज आहेत,’ असा दावा वाघेलांनी केला.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x