4 May 2025 6:32 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SCSS Interest Rate | ज्येष्ठ नागरिकांना फायदाच-फायदा, 12 लाख रुपये व्याज आणि 42 लाख रुपये परतावा मिळेल Post Office Scheme | कमाल आहे, ही योजना गुंतवणुकीवर देईल 40,68,209 रुपये परतावा आणि प्लस महिना 24,000 रुपये उत्पन्न HDFC Mutual Fund | पगारदारांनो! बिनधास्त गुंतवणूक करा, 12 पटीने गुंतवणुकीचा पैसा वाढेल, संपत्तीत मोठी वाढ होईल Bonus Share News | फ्री बोनस शेअर्सचा पाऊस पडणार, ही कंपनी फ्री बोनस शेअर्स देणार, संधी सोडू नका Horoscope Today | 05 मे 2025, तुमच्यासाठी सोमवारचा दिवस कसा असेल? तुमचे सोमवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार सोमवार 05 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या REC Share Price | 764 टक्के परतावा देणारा शेअर खरेदी करा, झटपट 25 टक्के कमाईची संधी - NSE: REC
x

तेलंगणा: मोदींविरोधात मैदानात उतरलेल्या २४ शेतकऱ्यांचा उमेदवारी अर्ज बाद

Telangana, Farmers, Narendra Modi, Loksabha Election 2019

हैदराबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात वाराणसीमधून निवडणूक लढण्यासाठी मैदानात उतरलेल्या तेलंगणाच्या तब्बल २४ शेतकऱ्यांचा उमेदवारी अर्ज निवडणूक आयोगाने रद्द केला आहे. निवडणूक आयोगाने एका शेतकऱ्याचा अर्ज स्विकारला आहे. आयोगाने ज्या एकमेव शेतकऱ्याचा अर्ज स्विकारला आहे त्यांचं नाव इस्तारी सुन्नम नरसईया असं आहे.

नरेंद्र मोदींविरोधात एकूण ११९ शेतकऱ्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. यामधील ८९ शेतकऱ्यांचा अर्ज आधीच रद्द करण्यात आला होता. यानंतर निजामाबादमधील ५५ आणि तामिळनाडूमधील ४० शेतकऱ्यांनी निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला होता, पण अखेर निजामाबादमधील २५ आणि तामिळनाडूमधील पाच शेतकऱ्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. निजामाबादमधील २५ उमेदवारांपैकी २४ उमेदवारांचे अर्ज गुरुवारी रद्द करण्यात आले. वाराणसीत उपस्थित निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्याने ही माहिती दिली आहे.

याआधी तेलंगणामध्ये निजामाबाद लोकसभा मतदारसंघातून ११७ शेतकऱ्यांनी सत्ताधारी तेलंगणा राष्ट्र समितीविरोधात (टीआरएस) निवडणूक लढवली होती. आपल्या मागण्या पूर्ण न झाल्याने शेतकऱ्यांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता. इतक्या मोठ्या प्रमाणात उमेदवारीसाठी अर्ज आल्याने मतदानादिवशी निवडणूक आयोगासमोर मोठा पेच निर्माण झाला होता. निवडणूक आयोगाने मतदान केंद्रांवर अतिरिक्त ईव्हीएम मशीन आणल्या होत्या. याशिवाय मोठ्या संख्येने पोलिसांना तैनात करण्यात आलं होतं.

नरेंद्र मोदी यांनी वाराणसीतून २०१४ लोकसभा निवडणूक लढवली होती. मोठ्या अंतराने नरेंद्र मोदी यांनी अरविंद केजरीवाल यांचा पराभव केला होता. या मतदारसंघात १९ एप्रिल रोजी मतदान पार पडणार आहे. मोदींविरोधात काँग्रेसने अजय राय यांना उमेदवारी दिली आहे. २०१४ मध्येही ते मोदींविरोधात लढले होते. आतापर्यंत चार टप्प्यातील मतदान पार पडलं असून २३ मे रोजी निकाल जाहीर होणार आहेत.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या