5 May 2025 12:28 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SCSS Interest Rate | ज्येष्ठ नागरिकांना फायदाच-फायदा, 12 लाख रुपये व्याज आणि 42 लाख रुपये परतावा मिळेल Post Office Scheme | कमाल आहे, ही योजना गुंतवणुकीवर देईल 40,68,209 रुपये परतावा आणि प्लस महिना 24,000 रुपये उत्पन्न HDFC Mutual Fund | पगारदारांनो! बिनधास्त गुंतवणूक करा, 12 पटीने गुंतवणुकीचा पैसा वाढेल, संपत्तीत मोठी वाढ होईल Bonus Share News | फ्री बोनस शेअर्सचा पाऊस पडणार, ही कंपनी फ्री बोनस शेअर्स देणार, संधी सोडू नका Horoscope Today | 05 मे 2025, तुमच्यासाठी सोमवारचा दिवस कसा असेल? तुमचे सोमवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार सोमवार 05 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या REC Share Price | 764 टक्के परतावा देणारा शेअर खरेदी करा, झटपट 25 टक्के कमाईची संधी - NSE: REC
x

चुनावी जुमला! मतदान जवळपास संपण्याआधी शेतकऱ्यांच्या खात्यातील २,००० रुपये परत घेतले?

Narendra Modi, Loksabha Election 2019

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या सहा टप्प्यातील मतदान पूर्ण झाले असून केवळ ७व्या टप्प्याचे मतदान उरले आहे. मात्र त्यानंतर हळुवारपणे पंतप्रधान शेतकरी सन्मान योजने अंतर्गत शेतकऱ्यांना देण्यात आलेले २,००० रुपये अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यातून काढून घेण्यात आल्याचे प्रकार अनेक ठिकाणी घडू लागले आहेत आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर संताप पसरला आहे.

सदर बातमी सध्या समाज माध्यमांवर असली तरी यूपीतील अनेक स्थानिक वृत्तपत्रांनी ही बातमी प्राधान्यांने छापली आहे. निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मोदी सरकारकडून अनुदान म्हणून प्रत्येकी २,००० रुपये टाकण्यात आले होते. त्यानंतर मोठ्या जाहिराती देखील प्रसिद्ध करून भाजपचे मंत्री मोठी मार्केटिंग सुद्धा करताना दिसले.

आता लोकसभा निवडणुकीचे मतदान जवळजवळ संपले आहे. आता राज्यातील काही शेतकऱ्यांनी आपल्या खात्यावरून २,००० रुपये परत घेण्यात आल्याच्या तक्रारी सुरु केल्या आहेत. मुजफ्फरपूरमधील जनपद भागातून अशा अनेक तक्रारी आल्या आहेत. आपल्या खात्यातून पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेचे दोन हजार रुपये अनुदान काढण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. बँकेत पैसे काढण्यास गेल्यानंतर खात्यावर पैसेच नसल्याचे समोर आले आहे. त्यानंतर शेतकऱ्यांना पंतप्रधान शेतकरी अनुदान योजनेचे पैसे परत घेण्यात आल्याचे समजले. या संदर्भात संबंधित बँकेच्या कर्मचाऱ्यांना विचारल्यानंतर त्यांनी सांगितले की, शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम नसून त्यांच्या खात्यातील रक्कम कट करण्यात आली आहे. सदर घटनेनंतर किसान एकता संघटनेने बँकांच्या कृतीचा विरोध केला असून सरकारने शेतकऱ्यांना धोका दिल्याचे म्हटले आहे.

२ महिन्यापूर्वी खात्यावर २, ००० रुपये जमा झाल्याचा संदेश आला होता. परंतु आता बँकेत पैसे काढण्यासाठी गेलो तर कळलं की, खात्यात रक्कम नाही, असं फिरोजाबाद येथील शेतकरी निरोत्तम सिंह यांनी सांगितले. दरम्यान, लोकसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकरी सन्मान योजना सुरू करण्यात आली होती. या योजनेअंतर्गत अल्प आणि अत्यल्पभूधारक शेतकऱ्यांना प्रतिएकर जमीनीप्रमाणे वर्षाला ६,००० रुपये अनुदान देण्यात येणार आहे. ही रक्कम शेतकऱ्यांना ३ टप्प्यात मिळणार होती. परंतु पहिल्या टप्प्यातील २, ००० मिळाल्यानंतर ते काढून घेण्यात आल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या