30 April 2024 3:38 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 30 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे मंगळवारचे राशिभविष्य | 30 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या DCB Bank Share Price | फायद्याचा बँकिंग शेअर! तज्ज्ञांनी दिली 'BUY' रेटिंग, अल्पावधीत मिळेल 30 टक्के परतावा Bonus Shares | अशी संधी सोडू नका! फ्री शेअर्स मिळवा, या दोन कंपन्यांकडून फ्री बोनस शेअर्सची घोषणा Sterling and Wilson Share Price | रिलायन्स ग्रुपची गुंतवणूक असलेल्या शेअरने 1 महिन्यात दिला 32% परतावा, पुढची टार्गेट प्राईस? Ircon Share Price | सरकारी कंपनीच्या शेअरमधून मजबूत कमाई करा, तज्ज्ञांनी टार्गेट प्राईसहित दिली फायद्याची अपडेट Patel Engineering Share Price | स्वस्त पटेल इंजिनीअरिंग शेअरमध्ये तेजीचे संकेत, टार्गेट प्राइस जाहीर, खरेदी करणार?
x

उद्धव ठाकरेंना परदेश दौरा संपल्यावर शेतकऱ्यांची आठवण: अजित पवार

Ajit Pawar, Sharad Pawar, Udhav Thackeray, Shivsena, NCP, Drought in Maharashtra state

मुंबई : महाराष्ट्र विधानसभेच्या दृष्टीने सर्वच राजकीय पक्ष कामाला लागली असून, आतापासूनच आरोप-प्रत्यारोप सुरु झाली आहे. त्यातच, परदेशी दौरे करून आल्यावर शिवसेनेला शेतकऱ्यांची आठवण येत असल्याची टीका, एनसीपीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. एनसीपी पक्षाचा आज २० वा वर्धापन दिन आहे. त्यानिमित्ताने ते बोलत होते.

सत्तेत असून शिवसेना म्हणते की, शेतकऱ्यांना पिकविम्याचे पैसे मिळाले नाही तर, आम्ही बघून घेऊ. शिवसेनला अजून देखील कळेना, आपण विरोधीपक्षात आहे की सत्ताधारी पक्षात. असा सणसणीत टोला अजित पवार यांनी शिवसेनेला लगावला. परदेशी दौरे पूर्ण झाली आहे शिवसेनेचे, दौरे पूर्ण झाल्यांनतर आता त्यांना दुष्काळाची आठवण येत आहे, असा खोचक टोला अजित पवारांनी सेनेला लगावला.

लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभेत परिस्थिती रहणार नाही. समविचारी पक्षांना एकत्र घेऊन चालायचे आहे. त्यासाठी अनेकांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचेही पवार म्हणाले. जनतेने आम्हाला पंधरा वर्षे संधी दिली होती,त्यामुळे, त्या जनतेसाठी जे-जे करता येईल ते करण्याचा आम्ही प्रयत्न करू असे पवार म्हणाले. राम मंदिराच्या मुद्यावरूनही अजित पवारांनी शिवसेनेचा समाचार घेतला. भावनिक मुद्दे हाती घेऊन सेना मते मिळवण्याचा केविलवाणा प्रयत्न करत असते. शिवसेना राम मंदिराचा विषय पुढे करून फक्त राजकरण करत असल्याचे अजित पवार म्हणाले.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x