9 May 2025 9:22 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Scheme | पगारदारांनो, या पोस्ट ऑफिसच्या योजनेत 2 लाख रुपये जमा करा, मिळावा 89,989 रुपये निश्चित व्याज Horoscope Today | 10 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शनिवार 10 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Rattan Power Share Price | पॉवर कंपनीचा पेनी स्टॉक 52-वीक लो लेव्हल जवळ, अपडेट जाणून घ्या - NSE: RTNPOWER IRB Infra Share Price | कंपनीच्या टोल उत्पन्नात वाढ; शेअर प्राईसवर होणार सकारात्मक परिणाम - NSE: IRB NTPC Share Price | एनटीपीसी शेअरची अपसाईड टार्गेट प्राईस जाहीर, मंदीत स्वस्तात BUY करा - NSE: NTPC AWL Share Price | मल्टिबॅगर शेअरमध्ये मोठ्या तेजीचे संकेत, ग्लोबल ब्रोकिंग फर्म बुलिश - NSE: AWL
x

गांधी जयंतीच्या दिवशीच मोदींनी राजस्थानमध्ये प्रचारात हिंदू-मुस्लिम मुद्दा पेटवला, लोकांना गळा चिरण्याच्या घटनेची आठवण करून दिली

Prime Minister Narendra Modi

Bihar Caste Survey | राजस्थान विधानसभा निवडणुकीपूर्वी कन्हैलाल हत्येचा मुद्दा पुन्हा एकदा जोर धरू शकतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी चित्तौडगडयेथील सभेत गेहलोत सरकारला घेराव घालत या घटनेची आठवण लोकांना करून दिली.

राजस्थानमधील लोक शांततेत तीज सण साजरा करू शकत नाहीत, दंगल कधी होईल हे त्यांना माहित नाही. मोदी पुढे म्हणाले की, भाजपचे सरकार स्थापन होईल आणि दंगली रोखल्या जातील. पंतप्रधान म्हणाले की, जीवित आणि मालमत्तेचे रक्षण करू न शकणारे कॉंग्रेस सरकार हटविणे खूप महत्वाचे आहे. विशेष म्हणजे मोदींच्या याच विधानानंतर समाज माध्यमांवर नेटिझन्स त्यांना गुजरात दंगल आणि मणिपूरची आठवण करून देतं आहेत.

चित्तौडगडमधील जाहीर सभेत पंतप्रधान मोदीयांनी महिला सुरक्षा, भ्रष्टाचारापासून कन्हैयालाल हत्येपर्यंतच्या मुद्द्यांवर गेहलोत सरकारला घेरले. “तुम्हीच सांगा, उदयपूरमध्ये जे घडलं, त्याची तुम्ही कल्पनाही केली नव्हती.

शत्रूवर फसवणुकीने हल्ला न करण्याची परंपरा जगणाऱ्या राजस्थानच्या मातीवर एवढं मोठं पाप घडलं. कपडे शिवण्याच्या बहाण्याने लोक न घाबरता टेलरचा गळा चिरतात. ते व्हिडिओ बनवतात आणि अभिमानाने व्हायरल करतात. काँग्रेस सरकारलाही व्होट बँकेची चिंता सतावत आहे. राजस्थानच्या वीर धाराबद्दल काँग्रेसने जगासमोर कोणती प्रतिमा मांडली? असं मोदी म्हणाले.

राजस्थानमध्ये कोणताही सण शांततेत साजरा करणे शक्य नाही, दंगली कधी उसळतील, संचारबंदी केव्हा लागू होईल, कुणास ठाऊक नाही. सामान्य माणसाला जीवाची, व्यापाऱ्याला व्यवसायाची आणि कामगाराला कामाची चिंता आहे, असे वातावरण काँग्रेसने राजस्थानमध्ये निर्माण केले आहे. हे वातावरण बदलायला हवं. दंगलखोर असो वा गुन्हेगार, हे फक्त भाजप सरकारच दुरुस्त करू शकते. हा आमचा ट्रॅक रेकॉर्ड आहे. त्यामुळे भाजप येऊन दंगल ी थांबवेल, असे लोक म्हणत आहेत.

News Title : Prime Minister Narendra Modi said on Kanhaiya Lal murder in Chittorgarh Rajasthan 02 October 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Prime Minister Narendra Modi(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या