4 May 2024 9:07 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 04 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या REC Share Price | PSU शेअर मालामाल करतोय, एका वर्षात 1 लाखाचे झाले 4 लाख, खरेदी करा स्टॉक Exide Share Price | शेअर नव्हे, पैसा छापण्याची मशीन! 1 महिन्यात दिला 50 टक्के परतावा, पुढची टार्गेट प्राईस जाहीर Hot Stocks | सुसाट तेजीने वाढणारे 4 स्वस्त शेअर्स खरेदी करा, रोज 20 टक्के अप्पर सर्किट हीट Piccadily Agro Share Price | दारू कंपनीचा शेअर रोज अप्पर सर्किट हीट करतोय, हा शेअर श्रीमंत करू शकतो Gold Rate Today | गुड-न्यूज! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Adani Wilmar Share Price | कमाई करून घ्या! मल्टिबॅगर अदानी विल्मर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

आणीबाणी: 'हा नवा भारत आहे' सांगणारे भाजप नेते अजूनही जुन्या आठवणीतच मग्न

Narendra Modi, Amit Shah, Rajanath Singh, Indira Gandhi

नवी दिल्ली : देशातील लोकशाहीच्या इतिहासातील काळा दिवस म्हणून आणीबाणीचा दिवस ओळखला जातो. २५ जून १९७५ रोजी देशात तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आणीबाणी घोषित केली होती. आज आणीबाणीच्या घोषणेला तब्बल ४४ वर्ष उलटली आहेत. आणीबाणी विरोधात पंतप्रधानांसह भारतीय जनता पक्षाच्या अनेक मंत्र्यांनी ट्विट करत या घटनेचा निषेध केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणीबाणीच्या विरोधातील एक खास व्हिडीओ ट्विट केला आहे तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी खास बॅनर बनवून राजकीय स्वार्थासाठी देशातील लोकशाहीची हत्या केली असं ट्विटमध्ये लिहिलं आहे.

तर केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी आणीबाणीवर ट्विट करताना लिहिलं आहे की, देशाची अखंडता कायम ठेवण्यासाठी नेहमी आणीबाणीच्या परिस्थितीची आठवण असणं गरजेचे आहे. पंतप्रधानांनी व्हिडीओ पोस्ट केला आहे त्यात संसदेत आणीबाणीवर पंतप्रधानांनी केलेल्या भाषणाचा काही भागही दाखविण्यात आला आहे.

केंद्रीय गृहमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांनी ट्विट केलं आहे. यात त्यांनी लिहिलं आहे की, १९७५ मध्ये आजच्याच दिवशी आपल्याला राजकीय फायद्यासाठी देशातील लोकशाहीची हत्या करण्यात आली होती. देशातील नागरिकांचे मुलभूत हक्क हिरावून घेतले होते. वृत्तपत्रांवर टाळे लावले होते. लाखो देशभक्तांना देशात पुन्हा लोकशाही आणण्यासाठी नरकयातना सहन कराव्या लागल्या होत्या. त्या सर्वांना मी नमन करतो असं शहांनी लिहिलं आहे.

दरम्यान, स्वतःची पाठ थोपटताना वारंवार ‘ये नया भारत हैं’ अशी घोषणा देणारे मोदी सरकार वेळ काढून आणि अगदी ऑर्डर देऊन व्हिडिओ आणि बॅनर्स त्यांच्या ट्विटर आणि फेसबुक अकाऊंटवरून झळकावून लोकांना जुन्याच आठवणीत रममाण करण्यात धन्यता मानत आहेत. विशेष म्हणजे अजूनही पुढील काही वर्ष इंदिरा गांधी आणि नेहरूंच्या नावानेच भाजपचे नेते ‘नव्या भारतात’ स्वतःच राजकारण करत राहतील अशीच शक्यता सध्यातरी दिसत आहे.

हॅशटॅग्स

#Amit Shah(265)#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x