1 May 2024 10:52 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | गरीब सुद्धा खरेदी करू शकतील हे 2 रुपये ते 9 रुपये किमतीचे 10 पेनी शेअर्स, अल्पावधीत मोठा परतावा JP Power Share Price | शेअर प्राईस 19 रुपये! जयप्रकाश पॉवर शेअर पुन्हा 'पॉवर' दाखवणार, स्टॉक खरेदीला गर्दी SBI Mutual Fund | पगारदारांनो! SBI च्या 5 मल्टिबॅगर SIP योजना सेव्ह करा, दरवर्षी पैसा वेगाने वाढवा Numerology Horoscope | 01 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 01 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या PSU Stocks | या PSU शेअरने अल्पावधीत दिला 200% परतावा! कंपनीबाबत सकारात्मक अपडेटने शेअर्स खरेदीसाठी गर्दी Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी हे टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, झटपट 22 टक्केपर्यंत परतावा मिळेल
x

अनधिकृत बांधकामामुळे अशा घटना घडतात पण त्याला पालिका जबाबदार नाही - संजय राऊत

malad incident, sanjay raut, monsoon rains, mumbai jam, shivsena, uddhav thackeray, bmc

मुंबई: मालाडमध्ये भिंत कोसळून झालेली दुर्घटना हि महापालिकेचं अपयश नाही तर तो एक अपघात आहे असं वक्तव्य सेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. मालाडमध्ये भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत 18 जणांचा मृत्यू झाला असून 60 पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत. संजय राऊत यांच्यामते पावसाळा सुरु होण्या आगोदर उद्धव ठाकरेंनी स्वतः मुंबईभर फिरून नालेसफाईची पहाणी केली होती.

अनधिकृत बांधकामांमुळे अशा प्रकारच्या घटना नेहमी घडत असतात. मालाडमध्ये झालेली जीवितहानी अपघातानं झाली आहे आणि ते पालिकेचं अपयश नाही. असे अपघात देशात कुठेही आणि कधीही घडू शकतात, असंदेखील संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

परंतु सर्वसामान्य मुंबईकराला पडलेला प्रश्न म्हणजे जर असे अपघात अनधिकृत बांधकामांमुळे घडत असतात तर मग पालिका नक्की करते तरी काय? त्यांच्या नाकाखाली हे सगळे अनधिकृत धंदे चाळतातच कसे? मुंबई महानगरपालिकेमध्ये शिवसेनेची सत्ता आहे, मुंबईमध्ये होणाऱ्या अनधिकृत बांधकामांची त्यांना खबर नाही का? असे नाना विविध प्रश सर्वसामान्य लोकांना पडत असतात.

संजय राऊत आपल्या विधानाला बळकटी देण्यासाठी रशियाचा दाखला देत म्हणाले “रशिया तंत्रज्ञानाच्या बाबतीत भारतापेक्षा पुढे आहे, मात्र तरीही सध्या तिथे पूर आला आहे” असं म्हणत राऊत यांनी पालिका प्रशासनाची बाजू सावरण्याचा प्रयत्न केला. कालच दिलेल्या मुलाखतीत मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्यामते मुंबई तुंबलीच नाही, गाड्या रस्त्यांवर धावत आहेत आणि मुंबई सुरळीत आहे. केवळ पाणी साचलं आहे, अशी सारवासारव महाडेश्वर यांनी केली.

यंदा नालेसफाईची कामं व्यवस्थित झाल्यानं पाणी तुंबणार नाही, असा दावा पालिकेकडून करण्यात आला होता. मात्र पालिकेच्या दाव्याची पावसानं अवघ्या आठवड्याभरात पोलखोल केली. विशेष म्हणजे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या मातोश्री निवासस्थानापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या भागातही गुडघाभर पाणी साचलं.

हॅशटॅग्स

#SanjayRaut(8)#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x