29 April 2024 9:01 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 30 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे मंगळवारचे राशिभविष्य | 30 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या DCB Bank Share Price | फायद्याचा बँकिंग शेअर! तज्ज्ञांनी दिली 'BUY' रेटिंग, अल्पावधीत मिळेल 30 टक्के परतावा Bonus Shares | अशी संधी सोडू नका! फ्री शेअर्स मिळवा, या दोन कंपन्यांकडून फ्री बोनस शेअर्सची घोषणा Sterling and Wilson Share Price | रिलायन्स ग्रुपची गुंतवणूक असलेल्या शेअरने 1 महिन्यात दिला 32% परतावा, पुढची टार्गेट प्राईस? Ircon Share Price | सरकारी कंपनीच्या शेअरमधून मजबूत कमाई करा, तज्ज्ञांनी टार्गेट प्राईसहित दिली फायद्याची अपडेट Patel Engineering Share Price | स्वस्त पटेल इंजिनीअरिंग शेअरमध्ये तेजीचे संकेत, टार्गेट प्राइस जाहीर, खरेदी करणार?
x

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यास आनंदच होईल : नीलम गोऱ्हे

MLA Nilam Gorhe, Shivsena, Uddhav Thackeray, Maharashtra Assembly Election 2019

मुंबई : विधानसभा निवडणूक जस जशा जवळ येत आहेत तसतशी शिवसेनेतील नेत्यांची रोज निरनिराळी वक्तव्य समोर येत आहेत. अनेकांनी यापूर्वी युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्याबाबतर अनेक वक्तव्य केली आहेत. सामान्य मतदार निवडणुकीत कौल कुणाच्या बाजूने देणार आणि पुढचा मुख्यमंत्री कोण होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे. अशातच विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाल्यास आपल्याला आनंदच होईल अस वक्तव्य केले आहे.

सोलापुमधील पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नातू म्हणून आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव म्हणून युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी विधिमंडळात यावे ही आम्हा सर्वांचीच इच्छा आहे, असे मत व्यक्त करतानाच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यास आनंदच होईल असंही त्या म्हणाल्या आहेत.

दरम्यान, पुढे बोलताना उद्धवसाहेबांचा विश्वास आमच्या दृष्टीने महत्वाचा आहे. राजकारणापासून उदासीन असलेला युवक आदित्य ठाकरे यांच्या कामाकडे आकर्षित होऊन येत आहे. आदित्य यांच्यामध्ये असलेल्या गुणांची ती चुणूकच आहे असे सांगतानाच राज्यातील जनतेच्या युतीकडून मोठ्या अपेक्षा आहेत. त्या अपेक्षा पूर्ण करण्यात येतील असेही गोऱ्हे म्हणाल्या.

त्यामुळे शिवसेना भाजपमध्ये युती झाली असली आणि देवेंद्र फडणवीस हेच पुन्हा पुढील मुख्यमंत्री होणार हे भाजपने जाहीर केले असले तरी शिवसेनेतील नेत्यांची रोज नवनवीन वक्तव्ये युतीत खोडा घालण्यासाठीच तर नाही ना, अशी चर्चा रंगली आहे. त्यामुळे जागावाटपात शेवटच्या क्षणी काय होईल ते देखील सांगता येणार नाही असं आजही अनेकांचं मत आहे.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)#udhav Thakarey(405)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x