
My EPF Money | सरकारी कर्मचाऱ्यांना रिटायरमेंटनंतर सरकारद्वारा निर्मित केलेल्या पेन्शनचा आधार असतो. दुसरीकडे, प्रायव्हेट कंपनीमध्ये काम करणाऱ्या व्यक्तीदेखील योग्य ठिकाणी गुंतवणूक करून वयाच्या 58 वर्षापासून पेन्शन स्वरूपात एक अमाऊंट सुरू ठेवू शकतात. यासाठी अनेक कर्मचारी नोकरीला असतानाच निवृत्तीसाठी वेगवेगळ्या ठिकाणी पैसे गुंतवत असतात. आयुष्यासाठी करोडो रुपये साठवून ठेवायचे असतील तर तुमच्याकडे ईपीएफचा पर्याय आहे.
ईपीएफो खात्याची महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला कोट्यवधी रुपये साठवून ठेवायचे असतील तर तुम्ही खात्यामधून कधीही पैसे काढले नाही पाहिजे. पैसे काढले नाही तरच ती रक्कम कोटींच्या घरात जाऊ शकते. जर तुम्ही मध्ये पैसे काढत असाल तर, हळूहळू गुंतवणुकीची रक्कम वाढवावी. जेणेकरून पीएफ खात्यात कोट्यवधी रक्कम जमा होईल.
पेन्शनचे नियम :
ईपीएफओ कर्मचाऱ्यांना पेन्शनही मिळवून देते. ही योजना 58 वर्षांपर्यंत पोहोचलेल्या आणि पात्र असलेल्या कर्मचाऱ्यांना लागू होते. योजनेचा लाभ घेण्यासाठी कर्मचाऱ्याच्या नोकरीचे दहा वर्ष पूर्ण झालेले असले पाहिजे. नियमानुसार कर्मचाऱ्याचे 9 वर्ष आणि सहा महिन्यांची सर्विस 10 वर्षांसाठी गणली जाते. कर्मचाऱ्यांचा संपूर्ण हिस्सा पीएफ खात्यात जमा होऊ लागतो. नीयोक्ताचा 3.67% भाग दरमहा ईपीएफमध्ये जातो तर, 8.33% भाग कर्मचारी पेन्शन योजनेत म्हणजेच ईपीएसमध्ये जातो.
50,000 पगारावर किती कोटी जमा होणार?
तुमचा मूळ पगार+DA आणि मासिक पगाराची एकूण संख्या मिळून पन्नास हजार रुपये असेल आणि पीएफ खात्यात प्रत्येक महिन्याला 12% योगदान होत असेल, सोबतच तुमचं वय 30 वर्षांपर्यंत असून सरकारमार्फत दिले गेलेले व्याज 8.1% असेल आणि तुमचा वार्षिक पगार 5% ने वाढला असेल तर, निवृत्तीपर्यंत तुमच्या खात्यात 2 कोटी 56 लाख 46,999 रुपये जमा होतील. पाठवलेल्या पैशांमुळे तुमचं म्हातारपण सोईस्कर बनेल.
किती योगदान द्यावे?
कर्मचाऱ्याच्या पीएफ खात्यात नीयोक्ता त्याच्या पगारातून जमा केलेल्या रक्कमेइतकीच रक्कम योगदान म्हणून देतो. सध्याच्या घडीला कर्मचाऱ्यांना पीएफ खात्यात 12% योगदान दिले जाते. सोबतच तेवढेच योगदान नीयोक्ता देखील करतो. तुम्ही हे योगदान वाढवू देखील शकता.