
Ration Card | केंद्र सरकारकडून गोरगरिबांसाठी विविध योजना राबवल्या गेले आहेत. जनतेचे कल्याण कसे होईल याचा विचार करून केंद्र सरकारने सर्व प्रवर्गातील व्यक्तींसाठी विविध योजना उपलब्ध करून दिले आहेत. या योजनांच्या मदतीने आज प्रत्येकजण स्वतःच्या पैशांचं व्यवस्थित प्लॅनिंग करून जास्तीत जास्त लाभ मिळवत आहेत. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत दारिद्र्य रेषेखालील असलेल्या नागरिकांना अन्नपुरवठा केला जातो. दरम्यान रेशन कार्ड वापरकर्त्यांसाठी सिलेंडरविषयीची एक मोठी खुशखबर जाहीर झाली आहे.
450 रुपयांत मिळणार सिलेंडर :
रेशन कार्ड धारकांना केवळ 450 रुपयांत सिलेंडर उपलब्ध होणार आहे. अन्न शिजवण्यासाठी सिलेंडर गॅस अत्यंत महत्त्वाचा असतो. या गॅसच्या किंमत अगदी गगनाला भिडल्या आहेत. तरी राजस्थान सरकारने 450 रुपयांच्या सिलेंडरची नवीन योजना सुरू केली आहे. या योजनेचा लाभ घेणाऱ्या व्यक्तीकडे एलपीजी आयडी प्रूफ त्याचबरोबर रेशन कार्ड असणे गरजेचे आहे.
राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा म्हणजेच NFSA मार्फत जे व्यक्ती गरजू आणि दारिद्र्यरेषेखालील आहेत त्यांना रेशन कार्डवर कमीत कमी किंमतीत धान्य लाभ होणार आहे. राजस्थान सरकारने या गोष्टीची जाहीर घोषणा केली असून. आतापर्यंत अनेकांना 450 रुपयांत सिलेंडर प्राप्त देखील झाला आहे. गरीब नागरिकांना अत्यंत दिल्याचा मिळाला आहे.
1 कोटींपेक्षा अधिक व्यक्तींनी घेतला सेवेचा लाभ :
मिळालेल्या माहितीनुसार राजस्थान मधील 1 कोटींपेक्षा अधिक व्यक्तींनी या योजनेचा लाभ घेतला आहे. यांपैकी केवळ 37 लाख व्यक्तींना 450 रुपयांचा सिलेंडर मिळत आहे. तरीसुद्धा 67 लाख व्यक्तींना कमी किंमतीचा सिलेंडर मिळाला नाहीये. लवकरात लवकर सर्वांसाठी ही गोष्ट लागू करण्यात येणार आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.