4 May 2025 12:39 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | 1644% परतावा देणारा 40 रुपयांचा शेअर खरेदी करा, फायद्याची अपडेट - NSE: RPOWER Mazagon Dock Share Price | संपत्तीत भर पडेल, तब्बल 3475% परतावा देणारा शेअर खरेदी करून ठेवा - NSE: MAZDOCK Horoscope Today | 04 मे 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 04 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Steel Share Price | मजबूत शेअर! टॉप ब्रोकिंग फर्मने जाहीर केली पुढची टार्गेट प्राईस - NSE: TATASTEEL Tata Power Share Price | बिनधास्त पैसे गुंतवा, पश्चाताप नाही होणार, भविष्यातील पैशाची चणचण दूर होईल - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL
x

कल्याण-डोंबिवलीकरांचे ६५०० कोटी आलेच नाहीत; आता ठाणेकरांवर गाजरांची खैरात?

CM Devendra Fadanavis, Kalyan Dombivali, Thane City, Vidhansabha Election 2019

ठाणे शहर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सध्या राज्यभर सभांचा सपाटा लावला असून त्यांच्या दिवसाला ३-४ सभा नियोजित असल्याचं कळतं. मात्र अनेक ठिकाणच्या आयोजकांनी सभेसाठी मागवलेल्या खुर्च्या देखील भरत नसून त्यांच्या सभेकडे लोंकांनी पाठ फिरवल्याचे दिसत आहे. प्रसार माध्यमांचे कॅमेरे सभेतील केवळ स्टेजचं चित्रीकरण करत असल्याने इतर वास्तव समोर येत नसल्याचं निर्दशनास येतं आहे.

तसाच काहीसा प्रकार ठाण्यातील सभेत पाहायला मिळाला आहे. भाजपचे ठाणे शहर येथील आमदार संजय केळकर यांच्या प्रचाराच्या निमित्ताने भाजपने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा आयोजित केली होती. मात्र यावेळी २००-३०० खुर्च्या देखील भरल्या नव्हत्या असं चित्र पाहायला मिळालं. विशेष म्हणजे खुर्च्या मोठ्या प्रमाणात मागविण्यात आल्या होत्या. मात्र स्थानिक मतदारांनी या सभेकडे पाठ फिरवल्याने आणलेल्या खुर्च्या तशाच थर लावून बाजूला ठेवण्यात आल्याचं दिसत होतं.

दरम्यान, मागील विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कल्याण-डोंबिवली शहराला तब्बल ६५०० कोटी रुपये देण्याचं आमिष दाखवलं होतं. मात्र २०१९ पर्यंत ते वचन हवेतच विरलं असून आता मुख्यमंत्र्यांनी २०१९ मधील विधानसभा निवडणुकीत ठाणेकरांना विकासाचं गाजर दाखवलं आहे. वाढत्या शहरीकरणामुळे वाहतूक कोंडीचा सामना करणाऱ्या ठाणेकरांसाठी ठाणे ते बोरीवली रोप-वे प्रकल्प आराखडा तयार करण्यात आला असून ३० मिनिटांत हे अंतर कापलं जाणार आहे. याचबरोबर जलवाहतूक, भुयारी मार्ग, मेट्रोचे जाळे, कोस्टल मार्ग आणि अवजड वाहनांची शहराबाहेरून वाहतुकीची योजना या माध्यमातून ठाणेकरांची वाहतूक कोंडीतून सुटका करणार आहोत तर एसआरए योजनेत मुंबईच्या धर्तीवर ठाण्यातही ३०० चौरस फुटाचे घर देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाणे शहरातील प्रचारादरम्यान केली आहे. त्यामुळे जे वचन कल्याण डोंबिवलीतील लोकांना २०१४ मध्ये दिलं गेलं जे आजही अधांतरीच आहे आणि त्यात आता ठाणे शहराला देण्यात आलेल्या नव्या आमिषांचा चर्चा रंगली आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Devendra Fadnavis(710)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या