पिंपळगाव: ‘महाराष्ट्राच्या निवडणुकीत मोदी आणि शहा या दोघांच्या तोंडात फक्त कलम ३७० आणी शरद पवार ही दोन नावं असतात. अमित शहा यांची तर मला काळजी वाटते. रात्री झोपेतही ३७० म्हणत असेल. त्यांची बायको काय म्हणत असेल याची मला चिंता आहे. इथं शेती करणं अवघड झालंय कोण त्या काश्मीरला जाऊन शेती करणार हे मला सांगा?’ असं म्हणत एनसीपी’चे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांचा खरपूर समाचार घेतला.

‘मोदी आणि शहा मला विचारतात, पवारांनी काय केलं? धोरणांवर टीका करा, पण वैयक्तिक टीका का? असा सवाल करत शरद पवार यांनी भारतीय जनता पक्षाच्या टीकेला उत्तर दिलं आहे. शरद पवार यांनी थेट पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांच्यावर निशाणा साधल्याने आगामी काळातही प्रचारादरम्यान एनसीपी आणि भारतीय जनता पक्षामध्ये जोरदार सामना होणार असल्याचं दिसत आहे.

शेती करणं अवघड झालंय; इथला काश्मीरला जाऊन शेती करणार आहे का? शरद पवार