7 May 2024 10:02 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
ICICI Mutual Fund | पैसे गुंतवा आणि हमखास दुप्पट परतावा घ्या, ही म्युच्युअल फंड योजना आहे खास फायद्याची Federal Bank Share Price | टॉप बोकरेज फर्मचा फेडरल बँक शेअर्स खरेदीचा सल्ला, पुढे मिळेल मोठा परतावा Ashirwad Capital Share Price | फ्री बोनस शेअर्स मिळवा! स्टॉक प्राईस 5 रुपये, पेनी शेअरची धडाधड खरेदी सुरु Adani Port Share Price | कंपनीकडून एक बातमी आली अदानी पोर्ट्स शेअर्स सुसाट वाढीचे संकेत मिळाले, फायदा घेणार? Rhetan TMT Share Price | 12 रुपयाचा शेअर श्रीमंत करेल, 2 दिवसात दिला 30 टक्के परतावा, खरेदी करणार? Horoscope Today | तुमचे मंगळवारचे राशिभविष्य | 07 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअर घसरून 12 रुपयांवर, तज्ज्ञांचा मोठा इशारा, फायदा की नुकसान?
x

समोर पैलवानंच नाही म्हणणाऱ्या फडणवीसांना पावसात भिजणारे पवार पुन्हा आठवले

NCP President Sharad Pawar, CM Devendra Fadnavis

मुंबई: विधानसभेच्या निवडणुकीत सगळ्यात जास्त काय गाजलं असेल तर ते साताऱ्यातलं शरद पवारांचं पावसातलं भाषण. शरद पवारांच्या या पावसात भिजण्यावर आता मुख्यमंत्र्यांनी खोचक टीका केली आहे. निवडणुकांमध्ये यश मिळवण्यासाठी पावसात भिजावं लागतं यामध्ये आमचा अनुभव कमी पडला अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी पवारांवर निशाणा साधला आहे. ते मुबंईमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी युतीच्या वादावरही मोठं वक्तव्य केलं आहे.

शरद पवार यांनी साताऱ्यात सभा घेतली आणि त्याचा परिणाम निवडूक निकाल आणि राज्यातल्या राजकारणावर दिसून आला. त्या एका भाषणाने भाकरी फिरवली. पर्यायाने काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या जागाही वाढल्या. कौल जरी महायुतीला मिळाला असला तरीही काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या जागाही वाढल्या. विरोधकांना चेहराच उरलेला नाही, समोर पैलवान दिसतच नाही या सगळ्या उत्तरांना शरद पवारांनी चोख प्रत्युत्तर दिलं. ज्याचा परिणाम मतदानावरही झाल्याचं पाहण्यास मिळालं.

विधानसभा निवडणुकीआधी अनेक आमदार भारतीय जनता पक्षात गेले असले तरीही राष्ट्रवादीनं चांगली लढत दिली. त्यावरुन अनेकांनी शरद पवारांच्या विजिगीषू वृत्तीचं कौतुक केलं. त्यावर भाष्य करताना मुख्यमंत्र्यांनी पवारांना टोला लगावला. ‘कोण त्यांना (पवारांना) मॅन ऑफ द मॅच म्हणतंय. कोण मॅन ऑफ द सीरिज म्हणतंय. पण सरकार कोणाचं स्थापन होतं हे महत्त्वाचं असतं,’ असं मुख्यमंत्री म्हणाले.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x