नवी दिल्ली: संसदेत बहुमताने सुधारित नागरिकत्व कायदा पारित झाल्यानंतर देशातील काही भागात हिंसक आंदोलन होत आहे. त्यामुळे विरोधी पक्ष जबाबदारीने वागत नसल्याचं दिसून येतं. राजकीय पक्षांनी आपापल्या ओवैसींना मुस्लिम मतांसाठी उतरविले आहे. औवेसी देशाचे नवे जिन्ना आहेत असा आरोप भाजपाचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी केला आहे.
छात्रों के कंधे पर बन्दूक रखकर जिस प्रकार से उन्हें मोहरा बनाया जा रहा है और अपनी राजनीतिक महत्वाकांक्षा को पूरा करने का प्रयास कुछ पॉलिटिकल पार्टियां कर रही हैं, वो कल से हम दिल्ली में देख रहे हैं और आज लखनऊ में भी हमने देखा: डॉ. @sambitswaraj
— BJP (@BJP4India) December 16, 2019
इस कानून में हिंदुस्तान के किसी भी नागरिक चाहे वह हिंदू हो या मुसलमान, के किसी भी अधिकार का हनन नहीं होगाl
CAA अधिकार छीनने का नहीं, अपितु अधिकार देने का कानून हैl
जिस प्रकार शांति और चैन छीनने का काम कांग्रेस, आम आदमी पार्टी और TMC कर रही है, वो निंदनीय है: डॉ @sambitswaraj pic.twitter.com/QiiOhex6VN
— BJP (@BJP4India) December 16, 2019
दरम्यान, संबित पात्रा यांनी जरी खासदार औवेसी यांना देशाचे नवे महंमद अली जिन्ना म्हटलं असलं, तरी त्याच पाकिस्तानचे जनक समजले जाणाऱ्या जिन्ना यांना भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी सेक्युलर असं त्यांच्या पश्चात प्रशस्तिपत्रक दिलं होतं. पाकिस्तानचे जनक महंमद अली जीना यांना मुस्मिांची संख्या अधिक असलेले परंतु, धर्मनिरपेक्ष राष्ट्र हवे होते, या आपल्या विधानाचा भारतीय जनता पक्षाचे नेते लालकृष्ण अडवाणी यांनी पुनरूच्चार केला होता. पात्यानंतर त्यांना पक्षाध्यक्ष पद सोडावे लागले होते.
जीना यांच्याबाबतीत हे माझे वैयक्तिक मत असल्याचे सांगत अडवाणी यांनी पुन्हा एकदा त्यांच्या भूमिकेचे समर्थन केले होते. २००५ मध्ये त्यांनी आपल्या पाकिस्तान दौऱ्यात जीना यांना धर्मनिरपेक्ष संबोधल्यामुळे गदारोळ उडाला होता. त्यांच्या विरोधात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्षातील अनेक नेत्यांनी ताशेरे ओढले होते. त्यानंतर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्याची वेळ आली होती. अखेर त्यांना पंतप्रधान पदाचे उमेदवार घोषित करून या प्रकरणावर पडदा टाकण्यात आला. पाकिस्तानचे पत्रकार एम. जे. अकबर यांच्या ‘टिंडरबॉक्स-द पास्ट अँड फ्युचर ऑफ पाकिस्तान’ या पुस्तकाच्या प्रकाशनाच्यावेळी त्यांनी पुन्हा एकदा आपल्या वाक्याचा पुनरूच्चार केला होता.
लोकसभेत विरोधी पक्षनेते असताना अडवाणी यांनी पाकिस्तान भेटीत ४ जून २००५ रोजी महंमद अली जीना यांच्यावर स्तुतिसुमने उधळल्यानंतर संघाचा चरफडाट झाला होता, मात्र जिना यांच्याविषयीच्या वक्तव्यावर अडवाणी नंतरही ठाम राहिल्याने, ते संघाच्या काळ्या यादीत गेले. त्यावेळचे सरसंघचालक सुदर्शन यांचा तो सूर पुढे नवनियुक्त सरसंघचालक मोहन भागवत यांच्या वक्तव्यांतूनही उमटत होता.
नंतरच्या लोकसभा निवडणुकीतील पक्षाच्या पराभवानंतर अडवाणी यांना थेट बाजूला न करता, त्यांनी विरोधी पक्षनेतेपद सोडावे अशी व्यूहनीती करण्यात आली. जानेवारी २०१० मध्ये अडवाणी यांच्या जागी सुषमा स्वराज यांची लोकसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड झाली. याच दरम्यान पक्षाचे नेतृत्वही नितीन गडकरी यांच्याकडे आले आणि पक्षात नवनेतृत्वाचा जमाना सुरू करण्याच्या संघाच्या इच्छेची फळे दिसू लागली.
Web Title: MIM MP Owaisi Jinnah a New India BJP has Taken Aggressive Post Making Serious Allegations Against over Opposition
