28 April 2024 3:02 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IndiGo Share Price | एक अपडेट आली आणि इंडिगो शेअर्स तेजीत, अल्पावधीत 32% परतावा दिला, संधीचा फायदा घ्या Sandur Manganese Share Price | अशी संधी सोडू नका! अवघ्या 1 महिन्यात या शेअरने 43% परतावा दिला, खरेदी करणार? Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 28 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Mazagon Dock Share Price | सरकारी कंपनीचा शेअर तुफान तेजीत, 2 वर्षांत दिला 685% परतावा, पुढची टार्गेट प्राईस? Adani Enterprises Share Price | अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स फोकसमध्ये, कंपनीबाबत मोठी अपडेट, फायदा होणार? HUDCO Share Price | PSU शेअर खरेदीला गर्दी, 1 वर्षात 369% परतावा दिला, तर 1 दिवसात 15% परतावा Tata Steel Share Price | टाटा स्टील आणि टाटा मोटर्स शेअर्समध्ये येणार सुसाट तेजी, कंपनीने दिली फायद्याची अपडेट
x

गांधींना मारणारा हिंदूच होता; १५% मुस्लिमांच्या नावाने ८५% हिंदूंना भीती दाखविण्याचा प्रयत्न

Urmila Matondkar, Nathuram Godse, Mahatma Gandhi

पुणे: नागरिकत्व दुरुस्ती कायदा मुस्लिमविरोधी आहेच, पण तो प्रत्येक गरीबाच्या विरोधात आहे, असं विधान अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी केलं आहे. १५ टक्के मुस्लिमांच्या नावाखाली ८५ टक्के हिंदूंना भीती दाखवून त्यांच्यावर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न होत आहे, असंही त्यांनी सांगितलं. पुण्यात एका कार्यक्रमात त्या बोलत होत्या. दरम्यान, या कार्यक्रमात हिंदू राष्ट्र सेनेच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत गोंधळ घातला.

‘केंद्र सरकारनं केलेला नागरिकत्व सुधारणा कायदा हा काळा कायदा आहे. तो केवळ मुस्लिमविरोधीच नाही तर तो गरीब विरोधीही आहे,ट अशी टीका उर्मिला मातोंडकर यांनी केली. देशात सध्या सगळ्या गोष्टी हिंदू मुस्लिम या पातळीवर आणून ठेवल्या जात आहेत. पण संविधानात जात, धर्म, लिंगावरून भेदभाव केला जात नाही, अशा गोष्टींना संविंधानात थारा नाही असं सांगत उर्मिला यांनी सीएए रद्द करण्याची मागणी केली.पुण्यातील गांधीभवनमध्ये सीएए आणि एनआरसीविरोधी अहिंसात्मक जनआंदोलन कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी त्यांनी सीएएवरून केंद्र सरकारवर टीकेची तोफ डागली.

पुढे मातोंडकर म्हणाल्या, ‘ महात्मा गांधी यांच्या विचारधारेचा आपण भाग आहोत, हा अभिमानाचा भाग आहे. घोषणाबाजी करणाऱ्यांनाही गांधीजींना अभिवादन करायला राजघाटावर जावे लागते, ही वस्तुस्थिती आहे. भारतीयता सर्वांच्या नसानसात आहे. अहिंसेविरुद्ध काहीही चालू देऊ नका. केवळ संसद म्हणजे देश नाही. नागरिक म्हणजे देश आहे, हे या कायद्याच्या संदर्भात लक्षात घेतले पाहिजे. आपला देशच आपल्याला ओळखू येणार नाही, इतका बदलू देऊ नका असे आवाहनही त्यांनी विरोधकांना केले ‘

‘लोकशाही म्हणजे लोकप्रतिनिधी नव्हे तर नागरिक होत. फॅसिझम फक्त अहिंसेपुढेच झुकेल. भारत हा गांधी विचारांचा देश आहे. ही ओळख पुसू देऊ नका. हा कायदा भारतीयत्वाला ललकारणारा आहे. या लढ्यात आग विझवणाऱ्या चिमणीप्रमाणे प्रत्येकाने योगदान द्यावे,’ असे आवाहन उर्मिला मातोंडकर यांनी केले आहे.

 

Web Title:  Hindu murder the Mahatmha Gandhi says congress leader Urmial Matondkar.

हॅशटॅग्स

#Congress(527)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x