5 May 2024 3:40 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 05 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Bonus Shares | ही कंपनी फ्री बोनस शेअर्स वाटप करणार, स्टॉक प्राईस देखील स्वस्त, स्टॉक खरेदीला गर्दी Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स शेअर बक्कळ कमाई करून देणार, अल्पावधीत मिळेल 33 टक्के परतावा IPO GMP | आला रे आला IPO आला! पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, गुंतवणुकीची संधी सोडू नका PSU Stocks | मल्टिबॅगर PSU शेअर मालामाल करणार, अल्पावधीत मिळेल मजबूत परतावा, खरेदीला गर्दी Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार! कंपनीबाबत अपडेट, स्टॉक प्राईस सुसाट वाढणार Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

मनसे अध्यक्षांनी स्वतःचा स्तर पाहून बोलावं : आशिष शेलार

मुंबई : काल शिवतीर्थावर झालेल्या प्रचंड सभेत राज ठाकरेंनी दिलेला ‘मोदीमुक्त भारत’ चा नारा भाजपच्या चांगलाच जिव्हारी लागल्याचे चित्र आहे. मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी यांनी राज ठाकरेंवर बोचरी टीका केली आहे.

राज ठाकरे यांनी आपला स्तर पाहून बोलावं आणि आधी राज ठाकरे यांच्या भाषणात बाळासाहेब ठाकरे यांचा प्रभाव दिसायचा आणि हल्ली राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा प्रभाव दिसून येत आहे अशी बोचरी टीका केली.

महाराष्ट्रातील जनतेने ज्यांना रोजगारमुक्त केलं आहे त्यांनी कालच्या सभेत ‘मोदीमुक्त भारत’ ची मुक्ताफळे उधळली आहेत अशी टीका आशिष शेलार यांनी राज ठाकरे यांच्यावर केली आहे. त्यांनी दिलेला ‘मोदीमुक्त भारत’ चा नारा म्हणजे जरा जास्तच झाले आहे, त्यामुळे मनसे अध्यक्षांनी आपला स्तर पाहून बोलावे असा टोला लगावला.

२०१४ मध्ये महाराष्ट्राची विधानसभा मनसेमुक्त झाली आणि मुंबई महापालिकेतील उरले सुरले नगरसेवकही पळून गेले. त्यामुळे यापुढे महाराष्ट्रातील जनता मनसेवर विश्वास ठेवणार नाही अशी टीका आशिष शेलार यांनी केली.

तर दुसरीकडे भाजपचे आमदार अतुल भातखळकर म्हणाले की, हे पराभूत मानसिकतेतून केलेली केविलवाणी धडपड असून, महाराष्ट्रानेच त्यांना मनसेमुक्त केलेलं आहे. मुळात मोदीमुक्त भारत करण्यासाठी त्यांच्याकडे नेते कोण आहेत असा सवाल करत ते गल्लीपुरतेच मर्यादित आहेत अशी बोचरी टीका सुद्धा केली.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x