7 May 2024 1:27 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HPCL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर खिसे भरणार, HPCL फ्री बोनस शेअर्स देण्याच्या तयारीत, खरेदीला गर्दी IREDA Share Price | PSU मल्टिबॅगर IREDA शेअरमध्ये प्रचंड घसरण होतेय, स्टॉक स्वस्तात Buy करावा की Sell? Adani Enterprises Share Price | अदानी ग्रुप शेअर्स घसरले, स्टॉक घसरणीचे नेमकं कारण काय? स्टॉक Hold करावा की Sell? Tata Technologies Share Price | मल्टिबॅगर शेअर उच्चांकापासून 25% घसरला, स्वस्तात खरेदीची संधी? तज्ज्ञांचे BUY रेटिंग Bonus Shares | फ्री शेअर्सचा पाऊस पडणार! झटपट पैसा दुप्पट करणारा शेअर खरेदी करा, संधी सोडू नका Penny Stocks | गरीब सुद्धा खरेदी करू शकतात हे 1 ते 9 रुपये किंमतीचे 10 पेनी शेअर्स, अल्पावधीत मोठा परतावा Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांसाठी खास फायद्याची सरकारी योजना, 8.2% व्याजासह इतर फायदेही मिळवा
x

भारतातील सर्व बँकांची जवाबदारी मोदींची नाही : अमित शहा

नवी दिल्ली : एका इंग्रजी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखत दरम्यान त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. ना खाऊंगा ना खाणे दूंगा अशी घोषवाक्य देत सत्तेत आलेलं मोदी सरकार आता जवाबदाऱ्या झटकू लागलं आहे. पीएनबी घोटाळ्यातील आरोपी नीरव मोदी विषयी बोलताना अमित शहा म्हणाले की, त्या बॅंकेनें गुन्हा दाखल करण्यापूर्वीच नीरव मोदीने देशातून पलायन केले होते असे उत्तर त्यांनी या मुलाखती दरम्यान दिले.

देशातील सर्वच बँकेत होणाऱ्या घोटाळ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी जवाबदार नसल्याचे विधानही त्यांनी केले. मोदी सरकार भ्रष्टाचार विरोधात कठोर भूमिका घेत असल्याचे विधानही त्यांनी केले. काही दिवसांपासून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे नीरव मोदी प्रकरणावरून मोदी सरकारवर जोरदार टीका करत आहेत, या प्रश्नाला उत्तर देताना अमित शहा म्हणाले की, राहुल गांधींच्या आरोपांची आणि भाषणाची दखल पत्रकार घेत असतील परंतु जनता घेणार नाही, कारण जनतेला सर्व ठाऊक आहे. आमच्या मोदी सरकारमधील मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे डाग नसल्याचे सुद्धा ते म्हणाले.

काँग्रेसच्या काळात आम्ही आरोप केले नव्हते तर ते कॅगच्या तपासातून उघड झाले होते तर काही कोर्टातील जनहित याचिकेमुळे समोर आले होते. जर काँग्रेस अध्यक्षांना वाटत असेल तर त्यांनी कोर्टात जावे असा सल्ला सुद्धा अमित शहा यांनी मुलाखती दरम्यान दिला. फ्रान्सच्या राफेल फायटर जेट करारात कोणताही घोटाळा झाला नसल्याचे ते म्हणाले.

मित्र पक्षांनी आमच्या बरोबर राहावं असं आम्हाला वाटतं, पण तेलगू देसम पार्टी आणि शिवसेना यांनी एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय स्वतःच घेतलेला आहे. विश्वासदर्शक ठराव आम्ही सहज जिंकू तसेच २०१९ मधील निवडणुकीत आम्ही २०१४ पेक्षा ही अधिक जागा जिंकू असा विश्वास व्यक्त केला.

हॅशटॅग्स

#Amit Shah(265)#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x