29 April 2024 11:27 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
PSU Stocks | हा PSU शेअर बंपर तेजीत वाढणार, 2 महिन्यात होईल मोठी कमाई, काय म्हटलं तज्ज्ञांनी? IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर्स 30 दिवसात मोठी परतावा देणार, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर IREDA Share Price | IREDA शेअर्स खरेदीसाठी गुंतवणूकदार तुटून पडले, कंपनीबाबत लेटेस्ट अपडेट, फायदा घेणार? Smart Investment | स्मार्ट इन्व्हेस्टमेंट! दर महिन्याला 5-10-15 हजार रुपये गुंतवून तुम्ही 1 कोटी रुपये मिळवू शकता HDFC Mutual Fund | सुवर्ण संधी! HDFC म्युच्युअल फंडाची नवी योजना लाँच, 100 रुपयांपासून करा गुंतवणूक Numerology Horoscope | 29 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 29 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

मंत्रालयात उंदीर घोटाळा, 'उंदीर मामा' मेले पण सरकारी 'भाचे' अखेर मोकाट ?

मुंबई : महाराष्ट्रात सुरु असलेल्या विधानसभेच्या अधिवेशनात माजी महसूल मंत्री आणि भाजपचे आमदार एकनाथ खडसे यांनी मंत्रालयातील ‘उंदीर घोटाळा’ उघडकीस आणला, ज्यामुळे राज्य सरकारच चांगलच हसू झालं आहे. एका खासगी संस्थेने म्हणजे अशी संस्था जिचं कार्यालय कुठे आहे तेच माहित नाही अशा संस्थेला हे काम देण्यात आलं. या संस्थेने राज्याच्या मंत्रालयात केवळ ७ दिवसात ३ लाख १९ हजार ४०० उंदीर मारल्याचा गौप्यस्फोट माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी विधानसभेत केला.

त्यावर भाजपचे आमदार राम कदमांनी असं स्पष्टीकरण दिल की, ३ लाख १९ हजार ४०० ही उंदरांची संख्या नसून त्या उंदरांना मारण्यासाठी वापरण्यात आलेल्या गोळ्यांची संख्या आहे. परंतु ७ दिवसात या ३ लाख १९ हजार ४०० गोळ्यांनी किती उंदीर मेले याच काहीच स्पष्टीकरण राम कदमांनी दिलं नाही. तसेच जर त्या गोळ्यांची संख्या ३ लाख १९ हजार ४०० इतकी मोठी होती तर त्या मंत्रालयात डंपरने उतरवून मग खोऱ्याने संपूर्ण मंत्रालयात पसरवल्या का याच कोणतही स्पष्टीकरण देण्यात आलं नाही.

केवळ भाजप मधल्या एका आमदाराच्या प्रश्नाला भाजपच्याच दुसऱ्या आमदाराने एक टोला लगावला की, खडसेंनी डोंगर पोखरून उंदिर काढला. बस झालं संपवला विषय इतक्यावरच काही थातुर-मातुर उत्तर देऊन. घोटाळा हा घोटाळा असतो आणि त्या घोटाळ्याची रक्कम किती लहान किंव्हा मोठी आहे यावर कदाचित त्या घोटाळ्याकडे जनतेने कस पाहावं हे ठरत असावं. म्हणूनच की काय भाजप आमदार राम कदमांनी स्पष्टीकरण देताना एक गोळी ‘केवळ दीड रुपया’ इतकीच आहे यावर जास्त जोर दिला आहे.

महाराष्ट्र मंत्रालयातील हा उंदीर घोटाळा, त्याचा दर्जा आणि त्यावर बाहेर आलेली स्पष्टीकरणं बघून महाराष्ट्रातील जनतेवर केवळ “उंदीर मामा की जय” बोलण्यावाचून दुसरा पर्याय उरलेला नाही. मंत्रालयातील ‘उंदीर मामा’ तर मेले, पण त्यांचे ‘सरकारी भाचे’ मात्र स्वस्तात मोकाट सुटले एवढंच जनतेने काय ते समजून घ्यावं.

या उंदीर घोटाळ्यातून एकच गोष्ट जनतेला उमगली आणि ती म्हणजे सरकारी कार्यालयातील ‘फाईल्स’ हे मारले गेलेले उंदीरमामा’ नाही तर ‘सरकारी भाचे’ कुरतडत असतात जे अस्तित्वात नसलेल्या कंपनीला कामाचा ठेका देत असतात आणि बदनाम होतात ते बिचारे उंदीरमामा.

उद्या याच ‘गणपतीबाप्पा’ प्रेमी मराठी माणसाने ‘उंदीर मामा की जय’ म्हणत सरकारलाच मतदान पेटीतून कुरतडून टाकलं तर नवल वाटायला नको.

हॅशटॅग्स

#Rat Scam(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x