2 May 2025 6:57 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शनिवार 03 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या AWL Share Price | अदानी ग्रुपचा शेअर मालामाल करणार; अशी संधी सोडू नका, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: AWL Apollo Micro Systems Share Price | जबरदस्त शेअर, यापूर्वी दिला 1522%परतावा, नवीन अपडेट आली - NSE: APOLLO NTPC Green Energy Share Price | लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, मोठा रिटर्न मिळेल - NSE: NTPCGREEN Adani Power Share Price | तब्बल 53 टक्के परतावा कमाईची संधी, अदानी पॉवर शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPOWER Reliance Share Price | नोमुरा फर्म बुलिश; रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
x

त्या करारामुळे जवानांनी लडाखमध्ये शस्त्रांचा वापर केला नाही - केंद्राचं उत्तर

Union Foreign Minister S Jaishankar, Rahul Gandhi, Chinese troops in the Galwan Valley

नवी दिल्ली, १८ जून : पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यात चिनी सैनिकांसोबत झालेल्या चकमकीत २० भारतीय जवान शहीद झाल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारला अनेक प्रश्न विचारले आहेत. आपल्या जवानांना विनाशस्त्र शहीद होण्यासाठी का पाठवले होते ? अशी विचारणाही त्यांनी केली आहे. राहुल गांधी यांच्या प्रश्नाचं उत्तर केंद्रीय परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी दिलं आहे.

राहुल गांधींनी केलेल्या आरोपांना प्रत्युत्तर देताना एस. जयशंकर म्हणाले की, आपल्याला वास्तव समजून घेतले पाहिजे. सीमेवर कर्तव्य बजावत असलेला प्रत्येक जवान शस्त्रसज्ज असतो. आपली चौकी सोडत असताना सर्व जवान आपली शस्त्रे सोबत घेतात. १५ जून रोजी गलवान खोऱ्यात तैनात असलेल्या सैनिकांजवळसुद्धा शस्त्रे होती. चिनी सैनिकांशी हिंसक झटापट झाली, तेव्हा हत्यारांचा वापर न करण्याबाबतचा आदेश स्पष्ट होता. सीमेवर झालेल्या तणावावेळी हत्यारांचा वापर करायचा नाही हा नियम भारत आणि चीनच्या सैन्यामध्ये दीर्घकाळापासून चालत आला आहे. १९९६ आणि २००५ मधील करारांनुसार ही परंपरा पाळली जात आहे, असे जयशंकर यांनी स्पष्ट केले.

राहुल गांधी यांनी एक व्हिडीओ शेअर करत चीनची आपल्या विनाशस्त्र जवानांची हत्या करण्याची हिंमत कशी झाली ? तसंच आपल्या जवानांना विनाशस्त्र शहीद होण्यासाठी का पाठवले होते ? असे सवाल विचारले होते.

 

News English Summary: Congress leader Rahul Gandhi has asked a number of questions to the Modi government after 20 Indian soldiers were killed in a clash with Chinese troops in the Galwan Valley in eastern Ladakh. Why were your soldiers sent unarmed to be martyred? He has also asked such a question. Union Foreign Minister S Jaishankar has answered Rahul Gandhi’s question.

News English Title: Union Foreign Minister S Jaishankar has answered Rahul Gandhi question soldiers were killed in a clash with Chinese troops in the Galwan Valley in eastern Ladakh News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#China(26)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या