5 May 2024 10:23 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 06 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 06 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिक सेव्हिंग स्कीम की बँक FD? अधिक फायदा कुठे जाणून घ्या OnePlus Nord CE 4 Lite | वनप्लसचा नवीन स्वस्त स्मार्टफोन, 50MP कॅमेरा आणि 5500mAh बॅटरी, प्राईस जाणून घ्या CIBIL Score | पगारदारांनो! कमी क्रेडिट स्कोअरमुळे कोणताही लोन मिळणार नाही, झटपट असा सुधारू शकता क्रेडिट स्कोअर Motorola Edge 50 Ultra | मोटोरोलाचा नवा स्मार्टफोन धुमाकूळ घालणार, 50MP सेल्फी कॅमेरा, 125W फास्ट चार्जिंग मिळणार Brezza | ब्रेझा SUV च्या या व्हेरियंटवर बंपर सूट मिळतेय, हजारोंची बचत, मारुतीकडून किंमतीसह यादी जाहीर
x

देशावरील संकटांसाठी एनडीए सरकारची चुकीची धोरणं व भोंगळ कारभार जबाबदार - सोनिया गांधी

Sonia Gandhi, PM Narendra Modi, India China

नवी दिल्ली, २३ जून : व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आज काँग्रेस कार्यकारिणी समितीची बैठक घेतली. भारतीय सीमांवर निर्माण झालेल्या तणावासाठी मोदी सरकार जबाबदार आहे. चुकीची धोरणे आणि भोंगळ कारभार सीमेवरील तणावाचे मूळ असल्याची टीका सोनिया गांधी यांनी केली.

सोनिया गांधी म्हणाल्या की, नियंत्रण रेषेवर चीनसोबत तणाव सुरु आहे. भविष्यात काय होईल हे सांगता येत नाही पण आपली परिपक्व मुत्सद्देगिरी आणि निर्णायक नेतृत्त्व आपल्या प्रादेशिक अखंडतेचं संरक्षण करताना काय केलं जातयं याची माहिती देईल अशी अपेक्षा आहे, असे सोनिया गांधींनी यावेळी सांगितले.

“देश आज आर्थिक संकट आणि महामारीचा सामना करत आहे. यादरम्यान भारत-चीन सीमेवर झालेल्या चकमकीमुळे देशात तणाव आहे. या दोन्ही संकटांसाठी एनडीए सरकारचे चुकीचे निर्णय आणि धोरणं कारणीभूत आहेत” असं सोनिया गांधी यांनी म्हटलं आहे. तसेच इंधन दरवाढीचा भडका उडाला आहे. सातत्याने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होत आहे. इंधन दरवाढ सुरू असल्यावरून देखील सोनिया गांधी यांनी सरकारवर टीकास्त्र सोडलं. सरकार पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढवून लोकांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम करत असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे.

 

News English Summary: Congress President Sonia Gandhi today convened a meeting of the Congress Executive Committee through video conferencing. The Modi government is responsible for the tension on the Indian border. Sonia Gandhi criticized the wrong policies and mismanagement as the root cause of border tensions.

News English Title: Sonia Gandhi criticized the wrong policies and mismanagement as the root cause of border tensions News Latest Updates.

हॅशटॅग्स

#SoniaGandhi(7)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x