5 May 2024 12:57 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Health Insurance Premium | हेल्थ इन्शुरन्स घेणाऱ्यांना धक्का! 10 ते 15 टक्क्याने वाढणार पॉलिसी प्रिमिअम Gold Rate Today | अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदीच विचार आहे? तनिष्क, मलबार ज्वेलर्स आणि कल्याण ज्वेलर्सचे दर जाणून घ्या Govt Employee Pension | सर्व पेन्शनर्ससाठी महत्वाची अपडेट! SBI सहित 5 सरकारी बँकेत नवीन सुविधा सुरु, फायदा घ्या 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! HRA पासून ग्रॅच्युइटीपर्यंत फायदा, मोठी वाढ होणार Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 05 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Bonus Shares | ही कंपनी फ्री बोनस शेअर्स वाटप करणार, स्टॉक प्राईस देखील स्वस्त, स्टॉक खरेदीला गर्दी Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स शेअर बक्कळ कमाई करून देणार, अल्पावधीत मिळेल 33 टक्के परतावा
x

आपत्तींमुळे संपूर्ण वर्षच खराब आहे हा विचार करणं चुकीचं - पंतप्रधान

PM Narendra Modi, Ladakh, India China, Indian Army

नवी दिल्ली, २८ जून : पंतप्रधान नरेंद्र मोदी मन की बात कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधत आहेत. भारतावर कोरोनाचं संकट असताना, भारत कोरोनाशी सामना करत असतानाच यादरम्यान भारत शेजारील देशाकडून येणाऱ्या आव्हानांचाही सामना करत आहे. परंतु भारत मैत्री निभावतो तसं वेळ पडल्यास चोख प्रत्युत्तरही देत असल्याचं सांगत मोदींनी चीनला इशारा दिला आहे.

आपण भारताकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्यांना प्रत्युत्तर दिलं आहे. आपल्या जवानांचा अभिमान आहे. हुतात्म्यांसमोर संपूर्ण देश कृतज्ञ असल्याची भावना मोदींनी व्यक्त केली आहे. 2020 हे वर्ष खराब असल्याची चर्चा सुरु आहे. 2020 या वर्षात अनेक आपत्ती, संकटं आली, संकट येतच असतात परंतु या आपत्तींमुळे संपूर्ण वर्षच खराब आहे हा विचार करणं चुकीचं असल्याचं मोदींनी सांगितलं.

ज्या कुटुंबातले जवान शहीद झाले त्यांनीही घरातल्या दुसऱ्या मुलांना सैन्यातच भरती करणार असं म्हटलं आहे. शहीदांच्या कुटुंबांबद्दल देशाला अभिमान आणि गर्व आहे असंही मोदींनी म्हटलं आहे.

तसेच गेल्या अनेक वर्षांपासून भारताने कमी संकटांचा सामना केला आहे. एका वर्षात अनेक संकटांचा सामना आपण केला आहे. मात्र डगमगून जाण्याची गरज नाही. आपण संकटांचा सामना करतो आहोत असंही मोदींनी म्हटलं आहे. अनेक संकटांचा सामना करत आपल्याला पुढे जायचं आहे. या वर्षातच आपल्याला नवी स्वप्नं पाहायची आहेत हे कुणीही विसरु नये. मला १३० कोटी भारतीयांवर पूर्ण विश्वास आहे असंही मोदींनी म्हटलं आहे. संकट कितीही मोठं असलं तरीही भारताचे संस्कार हे निस्वार्थ भावनेने सेवेची प्रेरणा देतात हे अत्यंत महत्त्वाचं आहे” असंही त्यांनी स्पष्ट केलं.

 

News English Summary: India has faced fewer crises over the last several years. We have faced many crises in one year. But there is no need to waver. PM Narendra Modi has also said that we are facing crises.

News English Title: Indian Army Gave Strong Answer To China In Ladakh Says Prime MInister Narendra Modi News Latest Updates.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x