3 May 2025 4:42 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Power Share Price | बिनधास्त पैसे गुंतवा, पश्चाताप नाही होणार, भविष्यातील पैशाची चणचण दूर होईल - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL Yes Bank Share Price | येस बँक शेअर्सबाबत अलर्ट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, अपडेट नोट करा - NSE: YESBANK RVNL Share Price | मल्टिबॅगर आरव्हीएनएल शेअरबाबत फायद्याची अपडेट, एचडीएफसी सिक्योरिटीजने दिले संकेत - NSE: RVNL HAL Share Price | भक्कम कंपनी फंडामेंटल्स असलेला शेअर खरेदी करा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: HAL BEL Share Price | मल्टिबॅगर शेअर असावा तर असा, बिनधास्त खरेदी करून ठेवा, मजबूत परतावा मिळेल - NSE: BEL Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या
x

उद्धव ठाकरे म्हणतात, सध्याच्या सरकारात मंत्री, खासदार आणि जनतेचेही कास्टिंग काऊच

मुंबई : सामना संपादकीयमधून शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर अप्रत्यक्ष बोचरी टीका केली आहे. उद्धव ठाकरे म्हणतात, सध्याच्या सरकारात मंत्री, खासदार आणि जनतेचेही कास्टिंग काऊच सुरु आहे.

नुकतच देशातील बलात्कारांच्या घटनांवरून बॉलिवूडमधील कोरिओग्राफर सरोज खान यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता त्यांनी बलात्कार आणि कास्टिंग काऊचवरुन वादग्रस्त विधान केल्यावर संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या.

त्यानंतर काँग्रेसच्या महिला नेत्या रेणुका चौधरी यांनी प्रत्येक ठिकाणी कास्टिंग काऊच होतं अगदी संसददेखील याला अपवाद नाही असं धक्कादायक विधान केलं होत. त्यांच्या या विधानाने चांगलाच राजकीय धुरळा उडाला आहे. त्याचाच धागा पकडून आज शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनामधून प्रसिद्ध झालेल्या संपादकीय मधून सध्याच्या भाजप सरकारवर अप्रत्यक्ष टीका करण्यात आली आहे.

देशाच्या संसदेत महिला खासदार आहेत तसेच महिला अधिकारी व कर्मचारीही आहेत, पण ‘कास्टिंग काऊच’ची किंकाळी रेणुका चौधरींनी मारली आहे. रेणुका चौधरींच्या कास्टिंग काऊच संबंधित वक्तव्याने त्यांची किंकाळीने फार तर त्यांच्या काँग्रेस पक्षात खळबळ माजू शकेल. पण सध्याच्या भाजप सरकारमध्ये अनेक मंत्र्यांचे, खासदारांचे व जनतेचेही कास्टिंग काऊच चालले आहे असं विधान आजच्या संपादकीय मध्ये करण्यात आल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. सध्याच्या सरकारच्या काळात निर्भय असं कोणीच नसल्याने दडपण सहन करीत अनेकांचे जगणे सुरू आहे”, असे उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमध्ये म्हटले आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)#udhav Thakarey(405)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या