4 May 2024 9:37 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 04 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या REC Share Price | PSU शेअर मालामाल करतोय, एका वर्षात 1 लाखाचे झाले 4 लाख, खरेदी करा स्टॉक Exide Share Price | शेअर नव्हे, पैसा छापण्याची मशीन! 1 महिन्यात दिला 50 टक्के परतावा, पुढची टार्गेट प्राईस जाहीर Hot Stocks | सुसाट तेजीने वाढणारे 4 स्वस्त शेअर्स खरेदी करा, रोज 20 टक्के अप्पर सर्किट हीट Piccadily Agro Share Price | दारू कंपनीचा शेअर रोज अप्पर सर्किट हीट करतोय, हा शेअर श्रीमंत करू शकतो Gold Rate Today | गुड-न्यूज! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Adani Wilmar Share Price | कमाई करून घ्या! मल्टिबॅगर अदानी विल्मर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

उद्धव ठाकरे म्हणतात, सध्याच्या सरकारात मंत्री, खासदार आणि जनतेचेही कास्टिंग काऊच

मुंबई : सामना संपादकीयमधून शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर अप्रत्यक्ष बोचरी टीका केली आहे. उद्धव ठाकरे म्हणतात, सध्याच्या सरकारात मंत्री, खासदार आणि जनतेचेही कास्टिंग काऊच सुरु आहे.

नुकतच देशातील बलात्कारांच्या घटनांवरून बॉलिवूडमधील कोरिओग्राफर सरोज खान यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता त्यांनी बलात्कार आणि कास्टिंग काऊचवरुन वादग्रस्त विधान केल्यावर संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या.

त्यानंतर काँग्रेसच्या महिला नेत्या रेणुका चौधरी यांनी प्रत्येक ठिकाणी कास्टिंग काऊच होतं अगदी संसददेखील याला अपवाद नाही असं धक्कादायक विधान केलं होत. त्यांच्या या विधानाने चांगलाच राजकीय धुरळा उडाला आहे. त्याचाच धागा पकडून आज शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनामधून प्रसिद्ध झालेल्या संपादकीय मधून सध्याच्या भाजप सरकारवर अप्रत्यक्ष टीका करण्यात आली आहे.

देशाच्या संसदेत महिला खासदार आहेत तसेच महिला अधिकारी व कर्मचारीही आहेत, पण ‘कास्टिंग काऊच’ची किंकाळी रेणुका चौधरींनी मारली आहे. रेणुका चौधरींच्या कास्टिंग काऊच संबंधित वक्तव्याने त्यांची किंकाळीने फार तर त्यांच्या काँग्रेस पक्षात खळबळ माजू शकेल. पण सध्याच्या भाजप सरकारमध्ये अनेक मंत्र्यांचे, खासदारांचे व जनतेचेही कास्टिंग काऊच चालले आहे असं विधान आजच्या संपादकीय मध्ये करण्यात आल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. सध्याच्या सरकारच्या काळात निर्भय असं कोणीच नसल्याने दडपण सहन करीत अनेकांचे जगणे सुरू आहे”, असे उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमध्ये म्हटले आहे.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)#udhav Thakarey(405)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x