2 May 2024 10:22 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
ICICI Mutual Fund | लहान मुलांसाठी वरदान आहे ही म्युच्युअल फंड योजना, 10,000 रुपयांच्या SIP वर 1.90 कोटी परतावा Numerology Horoscope | 02 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 02 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Trent Share Price | टाटा ग्रुपच्या शेअरने 6 महिन्यात दिला 110 टक्के परतावा, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर NMDC Share Price | मल्टिबॅगर एनएमडीसी शेअर एका महिन्यात बक्कळ कमाई करून देईल, फायदा घेणार? NTPC Share Price | NTPC सहित हे 4 पॉवर शेअर्स तुफान तेजीत येणार, लवकरच करणार मालामाल Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव मजबूत धडाम झाला, तुमच्या शहरातील घसरलेले नवे दर तपासून घ्या
x

आम्ही राष्ट्रीय पुरस्कार स्मृती इराणींच्या हस्ते स्वीकारणार नाही

नवी दिल्ली : राष्ट्रपतींच्या व्यस्त वेळापत्रकामुळे काही पुरस्कार माहिती आणि प्रसारण मंत्री स्मृती इराणी यांच्या हस्ते दिले जाणार असल्याने आम्ही ते स्वीकारणार नाही असा आक्रमक पवित्रा पुरस्कार विजेत्यांनी घेतला आहे.

आज नवी दिल्लीत ६५ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचं वितरण दिल्लीच्या विज्ञान भवनात होणार आहे. परंतु या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांच्या वितरणावरून आणि पुरस्कार विजेत्यांच्या आक्रमक भूमिकेमुळे सरकारपुढे नवीन पेच निर्माण झाला आहे.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद सोहळा संपेपर्यंत उपस्थित राहू शकणार नाहीत, कारण आहे त्याचं राष्ट्रपतींच व्यस्त वेळापत्रक. त्याच कारणाने राष्ट्रपती एकूण पुरस्कार विजेत्यांपैकी अकराच मानकऱ्यांना सन्मानित करतील आणि इतर वेळापत्रकाप्रमाणे ठरलेल्या कार्यक्रमाला मार्गक्रमण करतील.

राष्ट्रपतींच्या या व्यस्त वेळापत्रकामुळे पुढील पुरस्कार हे माहिती आणि प्रसारण मंत्री स्मृती इराणी यांच्या हस्ते सुपूर्द केले जाणार आहेत. राष्ट्रीय पुरस्कार वितरण हे प्रथम तांत्रिक पुरस्कार आणि नंतर मुख्य पुरस्कार असा होतो. परंतु नेमके कोणते अकरा पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते सुपूर्द केले जाणार आहेत ते अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

परंतु हे राष्ट्रीय पुरस्कार जर आम्हाला राष्ट्रपतींच्या हस्ते वितरित केले जाणार नसतील तर आम्ही या आयोजित सोहळ्यावरच बहिष्कार टाकू असा आक्रमक पवित्र पुरस्कार विजेत्यांनी घेतल्याने सरकार समोर चांगलाच पेच निर्माण झाला आहे. म्होरक्या’चे दिग्दर्शक अमर देवकर यांनी स्पष्ट केलं की, “स्मृती इराणींकडून पुरस्कार स्वीकारण्यास आमचा विरोध नसून, हे राष्ट्रीय पुरस्कार असून ते राष्ट्रपतींकडून न दिले जाण्याला आमचा विरोध आहे. इतर पुरस्कार सोहळ्यात आम्ही स्मृती इराणींच्या हस्ते सन्मान स्वीकारलाच असता,” असं त्यांनी स्पष्ट केलं.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x