8 May 2024 4:24 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 08 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Jindal Stainless Share Price | मल्टिबॅगर 307% परतावा देणारा स्टॉक 'खरेदी' करण्याचा सल्ला, अल्पावधीत 30% परतावा मिळेल BHEL Share Price | PSU BHEL स्टॉकवर ब्रेकआउट, तज्ज्ञांकडून मालामाल करणारी मजबूत टार्गेट प्राईस जाहीर Yes Bank Share Price | येस बँक स्टॉकचार्ट काय संकेत देतोय? या प्राईसवर मजबूत सपोर्ट, तज्ज्ञांचा इशारा काय? Post Office Interest Rate | पोस्ट ऑफिसची मजबूत परतावा देणारी योजना, बचतीवर रु.56,830 फक्त व्याज मिळेल SBI Mutual Fund | नोट छापायची मशीन आहे ही SBI म्युच्युअल फंड योजना, 5,000 च्या SIP वर 1.37 कोटी रुपये परतावा Waaree Renewables Share Price | 2 रुपयाच्या शेअरची कमाल! 4 वर्षात दिला 137000% परतावा, खरेदी करणार?
x

भाजप व संघामुळेच हिंदू धर्माचे प्रचंड नुकसान: शंकराचार्य

नवी दिल्ली : भाजप आणि संघामुळेच हिंदू धर्माचे नुकसान होत असून सरसंघचालक मोहन भागवत यांना हिंदू धर्माबाबत काहीच माहिती नाही अशी थेट टीका करतानाच भाजपचे नेतेच भारतातील बीफचे सर्वात मोठे निर्यातदार असल्याचा गंभीर आरोप शंकराचार्य यांनी केला आहे.

‘आरएसएस’मुळे आणि सत्ताधारी भाजपमुळेच अलिकडील काही वर्षांत हिंदू धर्माचे मोठे नुकसान झाले आहे असा थेट आरोप शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती यांनी केला आहे. शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांच्यावरही तीव्र शब्दात टीका केली असून भागवतांना हिंदू धर्माबाबत काहीच माहिती नाही हे आमच्यासाठी फार धक्कादायक आहे असं विधान त्यांनी केलं आहे.

इंडिया टुडेसोबत बोलताना शंकराचार्य म्हणाले की, सरसंघचालक मोहन भागवत यांना हिंदू धर्माबाबत काहीच माहिती नाही हे फारच धक्कादायक आहे. पुढे शंकराचार्य असं सुद्धा म्हणाले की,’हिंदू धर्मात लग्न हा एक करार आहे. पण, विवाह ही जीवनभराची साथ आहे. मोहन भागवत म्हणतात की, जो भारतात तो हिंदूच आहे. मग, अमेरिकेत हिंदू आई-वडिलांच्या पोटी जन्माला आलेल्या मुलांना काय म्हणणा?’, असा खडा सवालही शंकराचार्यांनी विचारला आहे.

पुढे गोहत्यावर बोलताना शंकराचार्य म्हणाले की, ‘देशात प्रत्यक्षात भाजपचे नेतेच बीफचे सर्वात मोठे निर्यातदार आहेत. असे असतानाही भाजप गोहत्येचा विरोध करते आणि बीफ निर्यात हा भारताला लागलेला डाग असल्याचे असल्याचे सुद्धा शंकराचार्य यांनी स्पष्ट केलं.

पुढे शंकराचार्य यांनी भाजप सरकारवर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत ते असे;

१. भाजपने खरोखरच देशाला दिलेली अश्वासने पूर्ण केली काय?
२. खरोखरच हव्या त्या प्रमाणात नागरिकांना रोजगार मिळाला काय?
३. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातील गरीबातील गरीब व्यक्तिला १५ लाख रूपये देण्याचे अश्वासन दिले होते. ते खरेच पूर्ण झाले?
४. आयोध्येत राम मंदिर उभारले?

या सर्व प्रश्नांची उत्तर जनतेला देण्यात भाजपचे नेते अपयशी ठरले असून याच नेत्यांनी २०१४ मध्ये निवडणूक प्रचार केला होता असेही शंकराचार्य पुढे म्हणाले.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)#RSS(65)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x