नवी दिल्ली, २९ जानेवारी: शेतकरी नेते राकेश टिकैत यांच्या अश्रूंनी पुन्हा एकदा शेतकरी आंदोलनाला धार चढली आहे. सरकार पोलीस प्रशासनाच्या मदतीने शेतकरी आंदोलन दडपत आहे, असा गंभीर आरोप राकेश टिकैत यांनी केला होता. सरकार आणि पोलिसांच्या दबावामुळे संयमाचा बांध फुटलेल्या राकेश टिकैत यांना अश्रू अनावर झाले. हेच अश्रू खचलेल्या शेतकऱ्यांसाठी पुन्हा उमेद देणारे ठरले आहेत. गाझीपूरमध्ये शेतकरी पुन्हा एकवटण्यास सुरुवात झाली आहे.
दुसरीकडे शेतकरी आंदोलकांचा निषेध करणारी गर्दी इथे जमा झालेली दिसतेय. या गर्दीत आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांवर दगडफेक केली तसंच त्यांचे तंबूही नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न केला. सिंघू सीमा गेल्या दोन महिन्यांहून अधिक काळापासून शेतकरी आंदोलनाचं मुख्य स्थान बनलंय. कृषी कायद्याविरोधात जमलेल्या हजारो शेतकऱ्यांनी इथे ठाण मांडलंय.
विशेष म्हणजे सिंधू सिमेच्या अनेक कोपऱ्या कोपऱ्यातून मोठ्या प्रमाणावर गुंड तोंड झाकून आत शिरत असल्याचं रेकॉर्ड झालं आहे. त्यातील अनेकांना प्रसार माध्यमांनी विचारणा केली, पण त्यांनी दुरूनच निघून जाणं पसंत केलं. त्यामुळे येथे शेतकऱ्यांविरोधात स्थानिकांचा रोष असल्याच्या बातम्या पेरून मोठं षढयंत्र रचल्याचे निदर्शनास येत आहे.
VIDEO | सिंधी बॉर्डरवर शेतकऱ्यांविरोधात धुडगूस घालणारे गुंड घुसवले जातं आहेत pic.twitter.com/uDVfnA9JOk
— महाराष्ट्रनामा न्यूज (@MahaNewsConnect) January 29, 2021
News English Summary: The tears of farmer leader Rakesh Tikait have once again sharpened the farmers’ movement. Rakesh Tikait had made a serious allegation that the government was suppressing the farmers’ agitation with the help of the police administration. Rakesh Tikait, who lost his temper due to pressure from the government and the police, shed tears. These are the tears that have rejuvenated the farmers. In Ghazipur, farmers have started regrouping.
News English Title: Delhi Sindhu border farmers protestant are in danger zone news updates.
