जम्मू-काश्मीर : जम्मू-काश्मीरमध्ये भाजपने मेहबूबा मुफ्ती सरकारचा पाठिंबा काढल्याने सरकार कोसळले आणि विरोधी पक्षाने सुद्धा सरकार स्थापन करण्यात रस न दाखविल्याने अखेर जम्मू-काश्मीरमध्ये राज्यपाल राजवट लागू करण्यात आली आहे.

कालच भाजपने राज्यपाल राजवट लागू करण्याची मागणी केली होती, त्याला राष्ट्रपतींनी आज मंजुरी दिली आहे. भाजपने पाठिंबा काढल्यानंतर मेहबूबा मुफ्ती यांनी राजीनामा दिला होता. त्यानंतर लगेचच राज्यपाल राजवटीसाठी हालचाली सुरु झाल्या होत्या आणि त्याला अखेर राष्ट्रपतींनी मंजुरी दिली आहे.

केवळ भाजपच नाही तर नॅशनल कॉन्फरन्सचे नेते उमर अब्दुल्ला यांनी सुद्धा जम्मू-काश्मीरचे राज्यपाल एन. एन. वोरा यांची विशेष भेट घेऊन राज्यात राज्यपाल राजवट लागू करण्याची मागणी केली होती.

जम्मू-काश्मीरमध्ये मागील काही महिन्यापासून दहशदवादी हल्ले, लष्करावरील वाढते हल्ले, अशांतता तसेच भाषण स्वातंत्र्याची गळचेपी आणि त्यातूनच पत्रकार शुजात बुखारी यांची हत्या अशा एक न अनेक घटना वाढतच असल्याने सरकारवर प्रचंड दबाव वाढला होता.

Governor rules are implemented in Jammu and Kashmir after approval of President of India