26 January 2025 1:49 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन कंपनीबाबत अपडेट, शेअर BUY करावा की SELL, तज्ज्ञांनी दिले संकेत - NSE: NTPCGREEN Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअरबाबत महत्वाचे संकेत, जेफरीज ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS Bonus Share News | फ्री शेअर्स मिळवा, ही कंपनी 23 रुपयाच्या मल्टिबॅगर शेअरवर फ्री बोनस शेअर्स देणार, फायदा घ्या - NSE: SBC SBI Mutual Fund | श्रीमंत करणाऱ्या 5 म्युच्युअल फंड योजना सेव्ह करा, महिना SIP वर मिळेल 1.35 कोटी रुपये परतावा EPFO New Rule | खाजगी कर्मचाऱ्यांनो, EPFO ने नियम बदलले, कागदपत्रांशिवाय प्रोफाइल अपडेट करा, अन्यथा घामाचा पैसा गमवाल New Auto Taxi Fare | अच्छे दिन आ गए, बस, रिक्षा आणि टॅक्सी भाड्यात मोठी वाढ, इतके पैसे मोजावे लागणार Yes Bank Share Price | येस बँकेच्या नफ्यात दुपटीने वाढ, शेअर प्राईसवर होणार परिणाम, अपडेट नोट करा - NSE: YESBANK
x

त्रिपुरात लोकसभेच्या २ जागा आहेत, मग भाजपने देशभर आनंद व्यक्त का केला ? विरोधक

नवी दिल्ली : सपा – बसपा शेवटच्या क्षणी एकत्र आले म्हणून लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपचा २ जागांवर पराभव झाला असे विधान भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी एका खासगी वृत्त वहिनीला दिल्याने विरोधकांकडून ही प्रतिक्रिया कानावर येत आहे.

समाजवादी पक्ष आणि बसपा शेवटच्या क्षणी एकत्र आल्याने उत्तर प्रदेश मधील पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव झाला होता असं मान्य करून, भाजपने पराभवाचे नक्की कारण शोधण्यासाठी एक समिती गठीत केली आहे. पुढे येणाऱ्या २०१९ मधील लोकसभा निवडणुकीत भाजप एकूण मतदानाच्या पन्नास टक्के मतदान मिळवून सर्वात मोठा पक्ष असेल असं एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अमित शहा यांनी म्हटलं आहे. तसच सपा-बसपाची ती खेळी २०१९ मध्ये निष्फळ ठरेल असं ही अमित शहा म्हणाले.

मुळात उत्तर प्रदेशातील निवडणूक ही केवळ २ जागांपुरतीच होती तरी सुद्धा काँग्रेसने मिठाई वाटल्याचे समजले. परंतु आम्ही त्यांच्याकडून ११ राज्य घेतली तसेच त्रिपुराबाबत सुद्धा कोणी बोलत नाही. मुळात पोटनिवडणुका ह्या स्थानिक मुद्यांवर केंद्रित असतात. त्याविरुद्ध सार्वत्रिक लोकसभा निवडणूकात मोठे मुद्दे विचारात घेतले जातात असं अमित शहा यांनी स्पष्ट केलं.

शिवसेना आणि टीडीपी बाबत विचारले असता अमित शहा म्हणाले की, एकूण ११ मित्र पक्षांपैक एकानेच एनडीएला रामराम ठोकला आहे आणि त्यांनी आम्हाला काहीच फरक पडत नाही अशी पुस्ती सुद्धा त्यांनी जोडली. अमित शहा जरी केवळ एकच पक्ष सोडून गेल्याचे म्हणाले असले तरी वास्तविक पाहता शिवसेना आणि गोरखा जनमुक्ती मोर्चाने सुद्धा एनडीए बरोबर फारकत घेतली आहे आणि अकाली दल सुद्धा नाराज असल्याचे समजते.

काय म्हणत आहेत विरोधक अमित शहांच्या युपी मधील ‘केवळ दोन’ जागांच्या वक्तव्यावर,

जर अमित शहा असं म्हणत असतील कि विरोधकांनी यूपीतील लोकसभेच्या केवळ २ जागा जिंकल्या म्हणून देशभर आनंद व्यक्त केला होता. भाजपने त्रिपुरा विधानसभा जिंकली असली तरी, संपूर्ण त्रिपुरात लोकसभेच्या केवळ २ जागा आहेत हे माहित असताना अमित शहांनी नागालँड आणि मणिपूर चे निकाल येण्यापूर्वीच घाई घाईत पत्रकार परिषद का बोलावली. त्यामागील मुख्य कारण देशभरात केवळ हवानिर्मिती करून वातावरण तापत ठेवणे असाच होता. वास्तविक संपूर्ण त्रिपुरात लोकसभेच्या केवळ दोनच जागा आहेत, जसं अमित शहा यूपीतील पराभवाचे वर्णन करताना लोकसभेच्या केवळ २ जागा आम्ही हरलो, ज्याने काहीच फरक पडत नाही असं स्पष्टीकरण देत आहेत.

हॅशटॅग्स

#Amit Shah(265)#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x