18 February 2025 12:59 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर फोकसमध्ये, घसरलेला शेअर 190 रुपयांची पातळी गाठणार का - NSE: TATASTEEL BEL Share Price | भक्कम डिफेन्स कंपनी शेअर खरेदी करा, पुढे पैशाचा पाऊस पाडेल, ऑर्डरबुक मजबूत - NSE: BEL Smart Investment | केवळ 10,000 पगार अन् तयार होईल कोटींची संपत्ती, 'या' स्मार्ट पद्धतीने केलेली गुंतवणूक बनवेल मालामाल Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर घसरतोय, पण टॉप ब्रोकरेज बुलिश, पुढे मजबूत कमाईची होणार - NSE: TATAPOWER Reliance Share Price | 36 टक्के कमाईची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मालामाल करणार, टार्गेट जाणून घ्या - NSE: RELIANCE Suzlon Share Price | सुझलॉन शेअर 50 रुपयांच्या खाली घसरणार, 6 महिन्यात 37% घसरला शेअर - NSE: SUZLON SBI Mutual Fund | SBI फंडाच्या मजबूत AUM असणाऱ्या योजना, डोळेझाकुन पैसा गुंतवा, 23 ते 34 लाख परतावा मिळेल
x

त्रिपुरात लोकसभेच्या २ जागा आहेत, मग भाजपने देशभर आनंद व्यक्त का केला ? विरोधक

नवी दिल्ली : सपा – बसपा शेवटच्या क्षणी एकत्र आले म्हणून लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपचा २ जागांवर पराभव झाला असे विधान भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी एका खासगी वृत्त वहिनीला दिल्याने विरोधकांकडून ही प्रतिक्रिया कानावर येत आहे.

समाजवादी पक्ष आणि बसपा शेवटच्या क्षणी एकत्र आल्याने उत्तर प्रदेश मधील पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव झाला होता असं मान्य करून, भाजपने पराभवाचे नक्की कारण शोधण्यासाठी एक समिती गठीत केली आहे. पुढे येणाऱ्या २०१९ मधील लोकसभा निवडणुकीत भाजप एकूण मतदानाच्या पन्नास टक्के मतदान मिळवून सर्वात मोठा पक्ष असेल असं एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अमित शहा यांनी म्हटलं आहे. तसच सपा-बसपाची ती खेळी २०१९ मध्ये निष्फळ ठरेल असं ही अमित शहा म्हणाले.

मुळात उत्तर प्रदेशातील निवडणूक ही केवळ २ जागांपुरतीच होती तरी सुद्धा काँग्रेसने मिठाई वाटल्याचे समजले. परंतु आम्ही त्यांच्याकडून ११ राज्य घेतली तसेच त्रिपुराबाबत सुद्धा कोणी बोलत नाही. मुळात पोटनिवडणुका ह्या स्थानिक मुद्यांवर केंद्रित असतात. त्याविरुद्ध सार्वत्रिक लोकसभा निवडणूकात मोठे मुद्दे विचारात घेतले जातात असं अमित शहा यांनी स्पष्ट केलं.

शिवसेना आणि टीडीपी बाबत विचारले असता अमित शहा म्हणाले की, एकूण ११ मित्र पक्षांपैक एकानेच एनडीएला रामराम ठोकला आहे आणि त्यांनी आम्हाला काहीच फरक पडत नाही अशी पुस्ती सुद्धा त्यांनी जोडली. अमित शहा जरी केवळ एकच पक्ष सोडून गेल्याचे म्हणाले असले तरी वास्तविक पाहता शिवसेना आणि गोरखा जनमुक्ती मोर्चाने सुद्धा एनडीए बरोबर फारकत घेतली आहे आणि अकाली दल सुद्धा नाराज असल्याचे समजते.

काय म्हणत आहेत विरोधक अमित शहांच्या युपी मधील ‘केवळ दोन’ जागांच्या वक्तव्यावर,

जर अमित शहा असं म्हणत असतील कि विरोधकांनी यूपीतील लोकसभेच्या केवळ २ जागा जिंकल्या म्हणून देशभर आनंद व्यक्त केला होता. भाजपने त्रिपुरा विधानसभा जिंकली असली तरी, संपूर्ण त्रिपुरात लोकसभेच्या केवळ २ जागा आहेत हे माहित असताना अमित शहांनी नागालँड आणि मणिपूर चे निकाल येण्यापूर्वीच घाई घाईत पत्रकार परिषद का बोलावली. त्यामागील मुख्य कारण देशभरात केवळ हवानिर्मिती करून वातावरण तापत ठेवणे असाच होता. वास्तविक संपूर्ण त्रिपुरात लोकसभेच्या केवळ दोनच जागा आहेत, जसं अमित शहा यूपीतील पराभवाचे वर्णन करताना लोकसभेच्या केवळ २ जागा आम्ही हरलो, ज्याने काहीच फरक पडत नाही असं स्पष्टीकरण देत आहेत.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Amit Shah(265)#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x