नवी दिल्ली, १६ जुलै | काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज काँग्रेसच्या समाज माध्यमांवर सेलमध्ये नियुक्त करण्यात आलेल्या स्वयंसेवकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी काँग्रेस सोडून गेलेल्यांवर टीका केली. ज्यांना भीती वाटते त्यांनी काँग्रेसमधून खुशाल जावं. ज्यांना कशाचीच भीती वाटत नाही असे लोक काँग्रेसमध्ये आहेत, त्यांचं स्वागत आहे. काँग्रेस सोडून गेलेले सर्व लोक संघाशी संबंधित होते, अशी टीका राहुल गांधी यांनी केली आहे.

राहुल गांधी यांनी यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांना फेक न्यूजमुळे घाबरून न जाण्याचं आवाहन केलं. भारतीय जनता पक्षाकडून येणाऱ्या फेक न्यूजमुळे घाबरून जाऊ नका. कोरोना काळात उत्तर प्रदेशात चांगलं काम केल्याचा दावा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ करत असतील तर त्यांच्यावर हसा. भारताच्या सीमाभागात चीनने घुसखोरी केली नाही, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणत असतील तर त्यांच्यावरही हसा, असं राहुल यांनी सांगितलं.

भाजपकडून पसरविण्यात येणाऱ्या फेक न्यूजवर विश्वास ठेवणं आता लोकांनी बंद केलं आहे. त्यामुळेच आता भाजपच्या फेक न्यूजबाबत घाबरण्याचं कारण नाही, असं त्यांनी सांगितलं.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Rahul Gandhi said congress worker should not fear BJP’s Fake News updates.

भाजपचं फेक न्यूज तंत्र आता लोकांनी ओळखलंय | काँग्रेस सोडून गेलेले लोकं RSS संबंधित होते – राहुल गांधी