नॉटिंगहॅम : विराट कोहलीच्या शतकी खेळीने आणि चेतेश्वर पुजारा तसेच हार्दिक पांड्याच्या अर्धशतकीय खेळीच्या जोरावर दुसरा डाव भारताने ३५२ धावांवर घोषित केला. भारतीय टीम सध्या सुस्थितीत असून विजयाची अशा आहे.
ट्रेंट ब्रिजचा रेकॉर्ड असा आहे की अजून पर्यंत कोणत्याही संघाने ३०० पेक्षा अधिक धावांच लक्ष पूर्ण केलेलं नाही. त्यामुळे भारताला विजयाची अशा असून इंग्लंडपुढे ३५२ धावांचे आवाहन ठेवल्याने ते पार कारण इंग्लंड टीम साठी सोपं नसल्याचं दिसत आहे.
तरी होमग्राउंड असल्याने इंग्लंड कडवी झुंज देऊ शकतो अशी शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे भारतीय फलंदाजांनी चांगली कामगिरी केली असली तरी गोलंदाज नेमकं काय करतात ते पाहावं लागेल.
