
IRCTC Railway Ticket | दररोज लाखो आणि करोडच्या संख्येने प्रवासी रेल्वेने प्रवास करतात. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हे जा करण्यासाठी त्याचबरोबर खासकरून लांबचा पल्ला गाठण्यासाठी व्यक्तींना ट्रेनचा प्रवास सोयीस्कर वाटतो.
भारतीय रेल्वे प्रवाशांसाठी एक खुशखबर असून त्यांच्या ॲडव्हान्स टिकिट बुकिंगचं टेन्शन रेल्वे प्रशासनाने कुठेतरी कमी केले आहे. रेल्वे प्रवाशांना 120 ऐवजी 60 दिवसांतच ॲडव्हान्स तिकीट बुकिंग करता येणार आहे. या नियमाचा अवलंब 1 नोव्हेंबर 2024 रोजी करण्यात येणार असून केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
60 दिवसांआधी तिकीट बुक करण्याचे फायदे जाणून घ्या
1) रद्द करणे आणि नो-शो मध्ये घट :
आधी तिकीट बुक करण्यासाठी 120 दिवसांचा टाईम पिरेड होता. एवढ्या मोठ्या वेळेमध्ये प्रवाशांना यात्रेची व्यवस्थित योजना आखता येत नव्हती. त्याचबरोबर कॅन्सलेशन देखील प्रचंड प्रमाणात वाढत होते. यासाठी रेल्वेने 60 दिवसांत तिकीट बुक करण्याचा नियम बनवला आहे.
2) विशेष ट्रेनचे चांगले नियोजन :
कॅन्सलेशन त्याचबरोबर नो-शो मुळे संख्या कमी होते. ज्यामुळे ग्राहक प्रवाशांची विजिबिलिटी चांगली मिळते. ज्यामुळे स्पेशल ट्रेनच्या योजना बनवून मॅनेज करण्यासाठी सोपे जाते.
3) जनरल क्लास तिकीटवर कोणताही परिणाम नाही :
जनरल क्लाससाठी खरेदी करणारे टिकीट यात्रेच्या तारखे जवळच खरेदी केले जाते. हे तिकीट प्रभावित नसल्यामुळे रेगुलर पॅसेंजर आणि शेवटच्या वेळेत कोणत्याही अडचणी शिवाय अगदी आरामात तिकीट प्राप्त करू शकतात.
4) तिकीट फ्रॉड होण्यापासून थांबणे :
120 दिवसांचा काळ असल्यामुळे तिकीट फ्रॉड होण्याच्या शक्यता वाढीस लागल्या होत्या. त्यामुळे बऱ्याच व्यक्तींबरोबर तिकीट फ्रॉडच्या केसेस घडू लागल्या होत्या. या कारणामुळे अडवांस टिकिट बुक करण्याचे दिवस 60 दिवस केले गेले आहेत.